शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार लोकसंख्येचा भार एकाच डॉक्टरवर

By admin | Updated: May 25, 2017 00:29 IST

सावली तालुक्यातील अंतरगाव प्राथिमक आरोग्य केंद्रात सहा उपकेंद्र येतात.

अंतरगाव आरोग्य केंद्रातील प्रकार : वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : सावली तालुक्यातील अंतरगाव प्राथिमक आरोग्य केंद्रात सहा उपकेंद्र येतात. मात्र या उपकेंद्रात एकच डॉक्टर असल्याने सुमारे २४ हजार ३६५ लोकांचे आरोग्य त्या एका डॉक्टरच्या हातात असल्याने चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी असल्याचे चित्र दिसून येत आहे.या आरोग्य केंद्रात एक एमबीबीएस दर्जाचा वैद्यकीय अधिकारी अपेक्षीत आहे. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी भोयर प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्याने त्यांच्या जागी वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार विहीरगावच्या उपकेंद्रातील बीएएमएस डॉक्टरांकडे देण्यात आला. तेव्हापासून ३० एप्रिल २०१७ पर्यंत एक उपकेंद्र व पीएचसी आणि शासकीय आरोग्य उपकेंद्राची जबाबदारी एकाच डॉक्टरावर होती. त्यासोबत एक निवासी वैद्यकीय अधिकारी अपेक्षित होता. मात्र ३० एप्रिलला प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवारत असलेले डॉ. उरकुडे यांची सेवानिवृत्ती झाली. तेव्हापासून वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच हे केंद्र सुरू आहे. शासनाचे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. या ठिकाणी असलेली रुग्णवाहिका अनेक महिण्यांपासून बिघडलेली आहे. सहा उपकेंद्रातून प्रसृतीकरिता किंवा आजारी रुग्णांना हलविण्यासाठी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही. परिणामी रुग्णांचे आरोग्य धोक्यात आहे.तसेच कडक उन्ह तापत असूनसुद्धा आरोग्य केंद्रातील एकही कुलर सुरू नाही. त्यामुळे रुग्णांना तसेच ग्रामीण भाग असल्याने वेळी अवेळी विद्युत सेवा खंडीत होत असते. मात्र येथील इन्वर्टर अनेक महिन्यांपासून बंद आहे. सदर आरोग्य केंद्र हे मागील १० ते ११ वर्षापासून २४ बाय ७ (आयपीएचएस)अंतर्गत सेवा देणारे केंद्र म्हणून विविध स्तरावरुन निधी पुरविला जातो. परंतु २४ बाय ७ अशी आरोग्य सेवा या परिसरातील रुग्णांना कधीही मिळाली नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना खासगी रुग्णालयाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे अधिक पैसे खर्च होत आहेत.विहिरगाव येथे एक उपकेंद्र आहे. तिथे बऱ्याच वर्षापासून एक परिचर रुग्णांवर उपचार करीत होता. येथील डॉक्टरांकडे पीएचसीचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार होता. मात्र ते आता सेवानिवृत्त झाले.व परिचर सेवा बढतीने स्थानांतरण झाले. त्यामुळे हे उपकेंद्र केवळ एका आरोग्य सेवीकेवर अवलंबून आहे. एक आरोग्य सेवक सोबतीला घेवून हे उपकेंद्र चालविण्याची नामूष्की आरोग्य विभागावर आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून शासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, पायाभूत सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.