शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सात संस्थाचालकांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा दणका

By admin | Updated: February 22, 2017 00:44 IST

विश्वस्त संस्थांचे लेखा अहवाल आणि फेरफार नोंदीसाठी गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम राबवूनही प्रतिसाद न देणाऱ्या ...

नोंदणी रद्द : अनुदान थांबविण्याचे आदेशचंद्रपूर : विश्वस्त संस्थांचे लेखा अहवाल आणि फेरफार नोंदीसाठी गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम राबवूनही प्रतिसाद न देणाऱ्या जिल्ह्यातील सात संस्थांना सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाने पहिला दणका दिला आहे. या सात संस्थांची नोंदणी रद्द करून त्यांचे अनुदान थांबविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.बल्लारपूर येथील प्रियदर्शनी एज्युकेशन सोसायटी, जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ नेरी (ता. चिमूर), स्वातंत्र्यविर सावरकर ज्ञान प्रसारक मंंडळ मूल, गुरूकुल बहुउद्देशिय संस्था मूल, श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ तांबेगडी (ता. सिंदेवाही), चंद्रपूर डिस्ट्रिक स्माल स्केल इंडस्ट्रिस असोसिएशन चंद्रपूर आणि चंद्रपूर इंजिनिअरिंग असोसिएशन चंद्रपूर अशी या संस्थांची नावे आहेत.महाराष्ट्र विश्वस्त संस्था अधिनियन १९५० च्या कलम २२ (३ अ) नुसार चौकशी पूर्ण केल्यावर ही नोंदणी रद्दबादलाची कारवाई करण्यात आली आहे. मागील पाच वर्षे व त्या पेक्षाही अधिक काळापासून संस्थेचे लेखा अहवाल सादर न करणे, चौकशीच्या कामी हजर न राहणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे या कार्यालयाने कळविले आहे. या संस्थांना समाजकल्याण विभाग अथवा शिक्षण विभागाकडून निधी मिळत असल्यास तो थांबविण्याचे आदेशही सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. मागील महिन्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात या मोहिमेसाठी विशवस्त संस्थांना आवाहन करून राज्यात विशेष अभियान राबविण्यात आले होते. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळाला होता. असे असले तरी राज्यात अनेक संस्थांकडून ही प्रक्रिया सुरू असल्याने या योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्यात हिशेब सादर न करणाऱ्या संस्थांवर संस्था रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावले जात आहेत.यामुळे गेल्या दिड महिन्यापासून या कार्यालयात संस्थाचालकांची आणि पदाधिकाऱ्यांची गजबज वाढली आहे. एकाच वेळी सात संस्थांची नोंदणी रद्द करण्याच्या या निर्णयामुळे विश्वस्त संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बरीच खळबळ निर्माण झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) लेखा अहवाल सादर न करणाऱ्या संस्थांवर नोटीस बजावण्यात आले आहेत. अशा संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी संबंधित तारखेला कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. ही कारवाई नियमानुसारच झाली असून यापुढेही सुरू राहणार आहे. संस्थाचालकांनी चौकशीत सहभाग घ्यावा आणि या मोहिमेची गांभीर्याने दखल घ्यावी. - आर. एन. चव्हाण धर्मदाय आयुक्त ०१, चंद्रपूर