शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी घोटाळ्याची चौकशी

By admin | Updated: October 15, 2015 01:12 IST

अंगणवाडीतील बालके व गरोदर महिलांना जिल्हा परिषदेतर्फे घरपोच टीएचआर पोषण आहार योजनेमध्ये काही ठिकाणी पुरवठ्यात अळ्या, ..

टीएचआर घोटाळा : लोखंडी बंडी घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचणारचंद्रपूर : अंगणवाडीतील बालके व गरोदर महिलांना जिल्हा परिषदेतर्फे घरपोच टीएचआर पोषण आहार योजनेमध्ये काही ठिकाणी पुरवठ्यात अळ्या, सोंडे सापडल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी टीएचआर पुरवठ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. लहान मुले व गरोदर मातांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.गेल्या काही दिवसांपासून लोखंडी बंडी गैरव्यवहार व टीएचआर पोषण आहार गैरव्यवहार हे मुद्दे गाजत असून संध्या गुरुनुले यांना लक्ष करून विरोधक आरोप करीत आहे. या आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, जि.प. सदस्य विनोद अहिरकर व सतीश वारजूकर यांची पत्रकबाजी गंभीरपणे घेण्याची गरज नाही. त्यांच्या अशा कार्यपद्धतीमुळे त्यांच्याच पक्षाचे किती सदस्य त्यांच्यावर विश्वास ठेवतात, हा संशोधनाचा प्रश्न आहे. प्रश्न उपस्थित करायचे व नंतर पुरवठाधारकांसोबत हितसंबंध जोडायचे, अशी आमची संस्कृती नाही. योजनेअंतर्गत गैरव्यवहार होत असले तर ही गंभीर बाब असून याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे मला वाटते.विनोद अहीरकर व सतीश वारजूकर यांनी टीएचआर मुद्दा वर्तमानपत्रात मांडल्यानंतर दोन दिवसानंतर होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सदर मुद्दा उपस्थित करण्याची गरज होती. लोखंडी बंडी गैरव्यवहारासंबंधाने सभेमध्ये मुद्दा उपस्थित होईल व त्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे चर्चेमध्ये सहभाग टाळण्यासाठी अध्यक्ष महोदय त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, असा क्षुल्लक मुद्दा उपस्थित करून सभेमधून त्यांनी पलायन केले. लोखंडी बंडी घोटाळ्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतच चौकशीचे आदेश दिल्यानंतर व त्यापूर्वीसुद्धा वर्तमानपत्रातून घोटाळ्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना लोखंडी बंडीचे देयके पुरवठाधारकास अदा करण्यात आल्याची बाब स्थायी समितीसमोर आली. तेव्हा सर्वच सदस्य अचंबित झाले. त्यामुळे जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले. बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा जनतेच्या कल्याणाची कामे करावी, असा सल्ला विनोद अहिरकर व सतीश वारजूकर यांना अध्यक्षांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)