शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

चरण्यासाठी गेले पाच बैल; परत आले चार, वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

By साईनाथ कुचनकार | Updated: April 9, 2023 15:26 IST

वायगाव (कुरेकार) येथील घटना.

चंद्रपूर:जिल्ह्यातील काही भागांमध्ये वाघाची दहशत आहे. यामुळे शेतात काम करणेही शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. दरम्यान, भद्रावती तालुक्यातील वायगाव (कुरेकार) येथील एका शेतकऱ्याने शेतशिवारात चरण्यासाठी सोडलेल्या पाच बैलांपैकी चार परत आले, तर एका बैलाला वाघाने ठार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. खरीपूर्व हंगामापूर्वीच बैलाला वाघाने ठार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावी, अशी मागणी केली जात आहे.

भद्रावती तालुक्यातील इरई धरणाच्या बाधित क्षेत्रातील वायगाव कुरेकार येथील शेतकरी पंडित कुरेकार यांनी आपल्या मालकीचे पाच बैल शुक्रवारी सकाळी शेतशिवारात चरण्यासाठी सोडले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास चार बैल घरी परत आले. मात्र त्यातील एक बैल परत आला नाही. शेतकऱ्यानी गावातील नागरिकांना घेऊन शोधाशोध केला. मात्र, बैल आढळला नाही. त्यानंतर शनिवारी पुन्हा शोध घेतला असता वाघाने बैल फस्त केल्याचे दिसून आले. शिकारीजवळ वाघ गुरगुरत असल्याने ग्रामस्थ परत आले. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता वाघ तिथेच बसून असल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वाघाने शिकार केली तिथे अनेक प्राण्यांना वाघाने फस्त केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. यासंदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली. या घटनेत शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. 

मागील वर्षीच घेतला गोरावायगाव येथील पंडित कुरेकार यांनी शेतीकामासाठी आनंदवन येथील बैल बाजारातून गोऱ्हा घेतला होता. यावर्षी आपल्या शेतीकामाला तो कामी येईल, अशी आशा शेतकऱ्याला होती. मात्र त्यापूर्वीच वाघाने त्याला ठार केल्याने शेतकऱ्याला दु:ख अनावर झाले. त्यामुळे परिसरात वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Tigerवाघ