शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराने अनेक गावे अंधारात

By admin | Updated: September 25, 2015 01:38 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमधील घोडणकप्पीत गेल्या चार महिन्यांपासून तर भारीमध्ये २५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे.

जिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमधील घोडणकप्पीत गेल्या चार महिन्यांपासून तर भारीमध्ये २५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करीत अंधारात रात्र काढावी लागत आहे. या बाबीची लेखी व तोंडी तक्रार दिल्यानंतरही दुर्लक्ष केले जात असून विचारणा करणाऱ्या ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर देत असभ्य वर्तणूकही दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात नियमित विद्युत पुरवठा सुरु ठेवण्याचे शासनाचे आदेश असताना भारी, घोडणकप्पी, खडकी, कुंभेझरी अशी अनेक गावे गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात आहे. तर वादग्रस्त असलेल्या १४ गावात मात्र अजूनही महाराष्ट्राची वीज पोहोचली नसल्याचे चित्र आहे. वारंवार नागरिकांकडून विद्युत पुरवठा सुरु करा, अशी मागणी केली जाते. मात्र विद्युत विभागाने गावात केवळ खांब उभे केले. इतर कामे करण्यासाठी ते टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जात आहे. कुठे वीजपुरवठा खंडीत तर कुठे विजेचा लंपडाव ही कायमची समस्या असली तरी यामुळे अनेकाची कामे रेंगाळली जात आहे. एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. (तालुका प्रतिनिधी)