शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

दूषित पाणी पिल्याने बकऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: February 9, 2016 00:46 IST

सनफ्लॅग भूमिगत कोळसा खाणीतील पाणी नाल्यामध्ये सोडले जाते, हे पाणी दूषित आहे.

ग्रामस्थांचा आरोप : पाणी सोडणे बंद करण्याची मागणी वरोरा : सनफ्लॅग भूमिगत कोळसा खाणीतील पाणी नाल्यामध्ये सोडले जाते, हे पाणी दूषित आहे. दूषित पाणी पिल्यामुळे कोंठाळा गावातील बकऱ्या मरण पावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीने दूषित पाणी सोडने बंद करावे अन्यथा मोठी प्राणहानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.येन्सा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोंढाळा पारधी टोल्यानजीक सनफ्लॅग भूमिगत कोळसा खाणीचे पाणी एका नाल्यामध्ये सोडले जाते. सदर पाणी बेलगाव, पिंपळगाव आदी गावानजीकच्या नाल्यामधून वाहत असते. सध्या सर्वत्र नदी नाल्यातील पाणी आटल्यामुळे कंपनीतून निघून जाणाऱ्या नाल्यातील वाहते पाणी जनावरे पित असता तर कोंढाळा पारधी टोल्यानजीक नाल्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी येत आहे, त्या ठिकाणी मोठी दलदल निर्माण झाली आहे. यामध्ये जीवित हानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे. ५ फेब्रुवारी रोजी कोंढाळा पारधी टोला येथील दिंगाबर पवार यांच्या दोन बकऱ्यांनी या नाल्यातील पाणी पिल्याने त्या अस्वस्थ झाल्या व ६ फेब्रुवारी रोजी मरण पावल्या. त्यामध्ये भूमिगत खदानीतील दूषित पाणी पिल्याने बकऱ्या मरण पावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)