शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

बांधकाम व्यावसायिक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

उड्डाणपुलावर मातीचा थर चंद्रपूर : शहरामध्ये चार ते पाच उड्डाणपूल आहेत. मात्र, या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे पाहिजे तसे लक्ष ...

उड्डाणपुलावर मातीचा थर

चंद्रपूर : शहरामध्ये चार ते पाच उड्डाणपूल आहेत. मात्र, या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे पाहिजे तसे लक्ष नाही. परिणामी, पुलावर मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेने पाणपोई सुरू करावी

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने चौकाचौकात पाणपोई सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी अनेक सामाजिक संस्थांनी पाणपोई सुरू केल्या होत्या.

बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावले जात आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याकड महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सिटीबस सुरू कराव्या

चंद्रपूर : चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, सिटीबस नसल्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने शहरात सिटीबस सुुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात नव्याने पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही योजना त्वरित सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

फूटपाथवरील वाहने हटवावीत

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रोडवरील वरोरा नाका चौक ते कुंदन प्लाझा चौकापर्यंत काही व्यावसायिक अगदी रस्त्यावरच वाहने पार्किंग करीत आहेत, तसेच काही व्यावसायिक नवीन वाहनेही रस्त्यावरच लावतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन वाहने हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

उद्यानाचे अस्तित्व धोक्यात

चंद्रपूर : शहरात काही वार्डांमध्ये मोकळ्या जागेवर नव्याने लहान उद्यान तयार करण्यात आले आहे. मात्र, या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

पाणी एटीएमची तपासणी करावी

चंद्रपूर : शहरातील पडोली, तसेच अन्य काही ठिकाणी नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणी एटीएम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, कक्षाची नियमित तपासणी, तसेच स्वच्छता केली जात नसल्यामुळे पाणी एटीएम केंद्रातून आजार होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.