शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

उड्डाणपुलावर मातीचा थर चंद्रपूर : शहरामध्ये चार ते पाच उड्डाणपूल आहेत. मात्र, या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे पाहिजे तसे लक्ष ...

उड्डाणपुलावर मातीचा थर

चंद्रपूर : शहरामध्ये चार ते पाच उड्डाणपूल आहेत. मात्र, या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे पाहिजे तसे लक्ष नाही. परिणामी, पुलावर मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेने पाणपोई सुरू करावी

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने चौकाचौकात पाणपोई सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी अनेक सामाजिक संस्थांनी पाणपोई सुरू केल्या होत्या.

बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावले जात आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याकड महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सिटीबस सुरू कराव्या

चंद्रपूर : चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, सिटीबस नसल्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने शहरात सिटीबस सुुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात नव्याने पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही योजना त्वरित सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

फूटपाथवरील वाहने हटवावीत

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रोडवरील वरोरा नाका चौक ते कुंदन प्लाझा चौकापर्यंत काही व्यावसायिक अगदी रस्त्यावरच वाहने पार्किंग करीत आहेत, तसेच काही व्यावसायिक नवीन वाहनेही रस्त्यावरच लावतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन वाहने हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

उद्यानाचे अस्तित्व धोक्यात

चंद्रपूर : शहरात काही वार्डांमध्ये मोकळ्या जागेवर नव्याने लहान उद्यान तयार करण्यात आले आहे. मात्र, या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

पाणी एटीएमची तपासणी करावी

चंद्रपूर : शहरातील पडोली, तसेच अन्य काही ठिकाणी नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणी एटीएम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, कक्षाची नियमित तपासणी, तसेच स्वच्छता केली जात नसल्यामुळे पाणी एटीएम केंद्रातून आजार होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.