शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

झोपडपट्टीधारकांना घरे बांधून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:30 IST

महावीरनगर झोपडपट्टी, शहीद करकरे चौक आणि बाबूपेठ परिसरात मागील ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून कुटुंबांसह वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार....

ठळक मुद्देनरेश पुगलिया : रेल्वे प्रशासनाने गरिबांवर अन्याय करू नये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावीरनगर झोपडपट्टी, शहीद करकरे चौक आणि बाबूपेठ परिसरात मागील ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून कुटुंबांसह वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्याच जागेवर महानगरपालिका व राज्य सरकारच्या माध्यमातून कायमस्वरुपी पट्टे देऊन घरे बांधून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रसिद्धिपत्रकातून केली आहे.नागभीड दक्षिण पूर्व रेल्वेने १५ नोव्हेंबर २०१७ ला झोपड्या हटविण्यासंबंधी पत्र दिले. शिवाय, जे. सी. बी. आणि कामगारांची मदत मागितली. महानगरपालिका व एमएसईबीला पिण्याच्या पाण्याचे नळ व विद्युत कनेक्शन तोडण्यासंबंधीही विनंती केली आहे.परंतु, रेल्वे प्रशासनाचे हे धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमाविरूध्द आहे.गोरगरीब जनतेला त्यांचा निवारा काढून घेण्याबाबतचे जे पत्र दिले आहेत. ते केंद्र सरकारच्या धोरणाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनीवर अशा प्रकारच्या झोपड्या असतील, तर त्यांचे पूर्नवसन करावे. ज्या पात्र व्यक्तींना एक लाख रूपये अनुदान केंद्र सरकार देणार आहेत. अथवा एखादी खासगी एजन्सी केंद्र व राज्य सरकारच्या संमतीने जागा विकसित करू इच्छित असेल, तर त्याकरिता जमिनीची किंमत न लावता पात्र लोकांना घरे बांधून द्यावी, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे. मात्र, रेल्वे विभागाने गरीबांच्या झोपड्या तोडून अन्याय केल्यास त्याविरुद्ध आवाज उठवू, असेही नरेश पुगलिया यांनी म्हटले आहे.