शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

वर्धा नदीवरील शिवणी येथे बंधारा बांधावा

By admin | Updated: May 27, 2016 01:12 IST

वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी, परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा,

चार तालुक्यांना लाभ : शासनाच्या दुर्लक्षाने गावकऱ्यांत रोषचंद्रपूर : वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी, परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, या उद्देशातून चंद्रपूर शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणी (बोर) येथे वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वी नागरिकांनी स्वाक्षरी अभियान राबविले. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.वर्धा नदीपट्टयातील जमीन सुपीक आहे. परिसरात सिंचनाची सुविधा झाल्यास तेथील शेती समृद्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. परंतु, सद्य:स्थितीत परिसरात सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. २० वर्षांपूर्वी या परिसरात हडस्ती, धानोरा (पिपरी) आणि शिवणी (चोर) येथे वर्धा नदीवर उपसा जलसिंचन योजना कार्यरत होत्या. परंतु, कालांतराने या तिन्ही योजना बंद पडल्या. तेव्हापासून या परिसरातील शेतकरी निसर्गावर अवलंबून शेती करीत आहेत.शिवणी येथे वर्धा नदीवर बंधारा झाल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. नदीकाठावरील राजुरा, कोरपना या तालुक्यातील गावांसोबतच चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील काही गावांना सिंचनाची सुविधा होईल. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटेल. यासाठी येथे बंधारा बांधण्यात यावा म्हणून परिसरातील शिवणी, धिडशी, चार्ली, निर्ली, पेल्लोरा, किनबोडी, कढोली येथील गावकऱ्यांनी स्वाक्षरी अभियान राबविले होते. परंतु, शासनाने येथील नागरिकांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. २००३ मध्ये शिवणी, मार्डा परिसरात बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु पुढे या कामाचे काय झाले, हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे शिवणी येथे बंधारा बांधून नागरिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केली आहे.शिवणी येथे बंधारा झाल्यास मार्डा, धिडसी, चार्ली, निर्ली, साखरी, पेल्लोरा, वरोडा, किनबोडी, कुर्ली, हडस्ती, कढोली, जैतापूर, भोयगाव, पिपरी, धानोरा आणि परिसरातील अन्य गावांना लाभ होणार आहे. त्यामुळे बंधारा बांधकामाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी उमाकांत धांडे यांच्यासह चार्लीच्या सरपंच पौर्णिमा दुबे, उपसरपंच किशोर ढुमणे, पेल्लोराचे उपसरपंच किशोर ढुमणे, पेल्लोराचे उपसरपंच भोयर, प्रमोद धांडे, जयश्री धांडे, सावित्री पंधरे, सुनीता वराटे, ताराताई कौरासे, संदीप डाखरे, लक्ष्मणराव एकरे, रवींद्र चटके, निमणीचे सरपंच गजानन भोंगळे, विनोद झाडे, संजय उमरे, रामदास उपरे, रमेश झाडे, बळीराम वैद्य, मंगेश भोयर, सुरेश पोडे, दौलतराव घटे, उत्तम बोबडे, वरोडाचे सरपंच साईनाथ देठे, नत्थू बोबडे, लहू भोयर, कवडू कौरासे, कवडू गोरे, सुरेश वराटे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, दीपक पाचभाई, पोवनीचे श्रावण मालेकर, निळकंठ दुबे, सुनील वनकर, नंदकिशोर कौरासे, पंकज दुबे, सुनील जीवतोडे, रामदास पंधरे, अनिल बहिरे, दत्ता तुराणकर, लटारी आवारी, अनिल तुरणकर, सुदर्शन क्षीरसागर, संजय गोरे, संबाशिव लाडे, कवडू पोडे, बाळा धांडे, संजय चटके, सुरेश ढुमणे, अनिल आस्वले, किशोर धांडे, डॉ. अरविंद ठाकरे, प्रा. देवराव ठावरी, दीपक पाचभाई, अशोक वासाडे, विवेक गोखरे, गणेश जोगी, राकेश गोखरे, बबन पारखी यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)