शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करावी

By admin | Updated: August 26, 2015 00:55 IST

ब्रह्मपुरी या नव्या जिल्ह्याची मागणी चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे एकत्रित असतापासूनची आहे.

विजय वडेट्टीवार यांची मागणी : मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना निवेदन चंद्रपूर : ब्रह्मपुरी या नव्या जिल्ह्याची मागणी चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे एकत्रित असतापासूनची आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यापूर्वी तत्कालिन सरकारने ब्रह्मपुरी जिल्ह्याची घोषणा सुद्धा केलेली होती. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी फार जुनी असून येथील जनतेने वारंवार आंदोेलन, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे जनतेच्या मागणीचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करुन नव्याने ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, महसूल मंत्री एकनाथराव खडसे, प्रधान सचिव महसूल यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.आमदार विजय वडेट्टीवार निवेदनात म्हटले आहे, राज्यात नव्याने २२ जिल्ह्याची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करुन नवे जिल्हे निर्माण करणे हे जनतेच्या आणि प्रशासकीय सेवेच्या दृष्टीने सोेईचे आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी फार जुनी असून ब्रह्मपुरी जिल्हा घोषीत झाल्यास अनेकांच्या सोयीचे ठरणार आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली त्यापूर्वी तत्कालिन सरकारने ब्रह्मपुरी जिल्ह्याची घोषणा सुद्धा केली होती. मात्र ही घोषणा हवेत विरली. चंद्रपूर जिल्हा मुख्यालय येथील नागरिकांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी नवा जिल्हा स्थापन झाल्यास सिंदेवाही, नागभीड, चिमूर, सावली, ब्रह्मपुरी येथील नागरिकांसाठी सोयीचे ठरणार आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)