शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

भद्रावती येथे बौद्ध महोत्सव

By admin | Updated: November 2, 2016 00:56 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समपना निमित्त ..

भदन्त राहुल बोधी : आज जगाला बुद्धांच्या शांतीमय विचारांची आवश्यकताभद्रावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समपना निमित्त ऐतिहासिक विंजासन बुद्ध लेणी, भद्रावती येथे दोन दिवसीय विराट बौद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विंजासन बुद्ध लेणी वर्षावास समिती भद्रावतीच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त डॉ. राहुल बोधी (विपश्यनाचार्य) मुंबई तर उद्घाटक म्हणून डॉ. वाणास्वामी महास्थाविर, अरुणाचलप्रदेश हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भदन्त सदानंद महास्थवीर केळझर, भदन्त सत्यशिल महास्थवीर नगापूर, भदन्त खेमधम्मो महास्थविर नागपूर, भदन्त कृपाशरण महास्थविर चंद्रपूर, इंद्रेश गजभिये भोपाल, उपासक सन्नी थायलंड, दिनेश पाटील, डॉ. चंद्रबोधी नाईक, डॉ. पुरण मेश्राम, प्रो. डॉ. सुरजित सिंग तसेच समितीचे मार्गदर्शक विनयबोधी डोंगरे, सिद्धार्थ सुमन, अध्यक्ष लिनता जुनघरे, निलेश पाटील, संजय खोब्रागडे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ५० भिक्खुसंघ उपस्थित होते.उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनयबोधी डोंगरे, संचालन सिद्धार्थ सुमन तर आभार संजय खोब्रागडे यांनी मानले. त्यानंतर उपस्थित सर्व भिक्खु संघांना चिवरदान करण्यात आले. भिक्खुसंघास भोजनदान डॉ. बि. प्रेमचंद व डॉ. माला प्रेमचंद भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले.दुसऱ्या सत्रात धम्मसंवाद व समारोपीय कार्यक्रम पार पडला. बौद्ध शासनात वर्षावासाचे महत्त्व व प्रासंगिकता यावर प्रा. डॉ. सुरजीतसिंग वर्धा यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सिद्धार्थ सुमन, संचालन संतोष रामटेके तर आभार जयदेव खाडे यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)समाजाला बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदलाआदर्श बौद्ध समाज निर्माण करणे आवश्यक आहे. समाजाला बदलवायचे असेल तर पहिले स्वत:ला बदलले पाहिजे. कुटुंब हा समाजाचा आधार आहे. कुटुंब बदलले पाहिजे आणि यासाठी स्वत:पासून सुरुवात करा, असे आवाहन भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी यावेळी केले. बौद्ध महोत्सवाच्या माध्यमातून एकत्रीत येवून धम्मचर्चा करणे, ही मंगलमय व जीवनात प्रकाश टाकणारी बाब आहे. धम्म श्रवण व पालन सर्वानी करावे, असेही ते म्हणाले. बौद्ध धम्म सागरा सारखा आहे. त्याला तलावासारखे बनवू नका. विहार हे शिक्षणाचे, प्रशिक्षणाचे, धम्माचे केंद्र आहे. तिथे दर रविवारी गेलेच पाहिजे असा आग्रहही त्यांनी धरला.