शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

भद्रावती येथे बौद्ध महोत्सव

By admin | Updated: November 2, 2016 00:56 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समपना निमित्त ..

भदन्त राहुल बोधी : आज जगाला बुद्धांच्या शांतीमय विचारांची आवश्यकताभद्रावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समपना निमित्त ऐतिहासिक विंजासन बुद्ध लेणी, भद्रावती येथे दोन दिवसीय विराट बौद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विंजासन बुद्ध लेणी वर्षावास समिती भद्रावतीच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त डॉ. राहुल बोधी (विपश्यनाचार्य) मुंबई तर उद्घाटक म्हणून डॉ. वाणास्वामी महास्थाविर, अरुणाचलप्रदेश हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भदन्त सदानंद महास्थवीर केळझर, भदन्त सत्यशिल महास्थवीर नगापूर, भदन्त खेमधम्मो महास्थविर नागपूर, भदन्त कृपाशरण महास्थविर चंद्रपूर, इंद्रेश गजभिये भोपाल, उपासक सन्नी थायलंड, दिनेश पाटील, डॉ. चंद्रबोधी नाईक, डॉ. पुरण मेश्राम, प्रो. डॉ. सुरजित सिंग तसेच समितीचे मार्गदर्शक विनयबोधी डोंगरे, सिद्धार्थ सुमन, अध्यक्ष लिनता जुनघरे, निलेश पाटील, संजय खोब्रागडे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ५० भिक्खुसंघ उपस्थित होते.उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनयबोधी डोंगरे, संचालन सिद्धार्थ सुमन तर आभार संजय खोब्रागडे यांनी मानले. त्यानंतर उपस्थित सर्व भिक्खु संघांना चिवरदान करण्यात आले. भिक्खुसंघास भोजनदान डॉ. बि. प्रेमचंद व डॉ. माला प्रेमचंद भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले.दुसऱ्या सत्रात धम्मसंवाद व समारोपीय कार्यक्रम पार पडला. बौद्ध शासनात वर्षावासाचे महत्त्व व प्रासंगिकता यावर प्रा. डॉ. सुरजीतसिंग वर्धा यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सिद्धार्थ सुमन, संचालन संतोष रामटेके तर आभार जयदेव खाडे यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)समाजाला बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदलाआदर्श बौद्ध समाज निर्माण करणे आवश्यक आहे. समाजाला बदलवायचे असेल तर पहिले स्वत:ला बदलले पाहिजे. कुटुंब हा समाजाचा आधार आहे. कुटुंब बदलले पाहिजे आणि यासाठी स्वत:पासून सुरुवात करा, असे आवाहन भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी यावेळी केले. बौद्ध महोत्सवाच्या माध्यमातून एकत्रीत येवून धम्मचर्चा करणे, ही मंगलमय व जीवनात प्रकाश टाकणारी बाब आहे. धम्म श्रवण व पालन सर्वानी करावे, असेही ते म्हणाले. बौद्ध धम्म सागरा सारखा आहे. त्याला तलावासारखे बनवू नका. विहार हे शिक्षणाचे, प्रशिक्षणाचे, धम्माचे केंद्र आहे. तिथे दर रविवारी गेलेच पाहिजे असा आग्रहही त्यांनी धरला.