शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर दोघेही रा. दाताळा (नवीन) अशी आरोपींची नावे आहेत. अंकित देहारकर, शुभम देहारकर व निलेश गोटे हे तिघेही चांगले मित्र होते. आरोपींनी निलेश गोटे याला उधारी पैसे दिले होते. मात्र गोटे हा पैसे परत करीत नव्हता. अशातच बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाताळा चौकात तिघांमध्ये पैशावरून वाद झाला.

ठळक मुद्देचंद्रपूरच्या म्हाडा कॉलनीतील घटना : दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनी येथे बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निलेश गोटे या युवकांवर तीन ते चार जणांनी चाकूने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पैशाच्या वादावरून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर दोघेही रा. दाताळा (नवीन) अशी आरोपींची नावे आहेत. अंकित देहारकर, शुभम देहारकर व निलेश गोटे हे तिघेही चांगले मित्र होते. आरोपींनी निलेश गोटे याला उधारी पैसे दिले होते. मात्र गोटे हा पैसे परत करीत नव्हता. अशातच बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाताळा चौकात तिघांमध्ये पैशावरून वाद झाला. त्यानंतर निलेश गोटे आपल्या म्हाडा कॉलनी येथील घरी निघून गेला. आरोपी अंकित व शुभम हेदेखील म्हाडा कॉलनीकडे गेले. यावेळी त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. अशात म्हाडा कॉलनी येथे त्यांनी निलेश गोटे याच्या घरासमोरच निलेशवर चाकूने हल्ला केला. हल्ला होत असताना निलेशचे वडील घटनास्थळी आले. हल्लेखोरांनी निलेशच्या अंगावर व मानेवर चाकूने गंभीर घाव केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी निलेशने आपल्या वडिलांना हल्लेखोरांचे नाव सांगितले. वडिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर यांच्याविरुध्द भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी केली.गुन्हेगारी वाढतेयमागील दोन महिने लॉकडाऊन होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तगडा होता. रात्री नागरिक घराबाहेर पडत नव्हते. मात्र आता लॉकडाऊन शिथिल केले आहे. तरीही सायंकाळी ५ वाजतानंतर जिल्ह्यात सर्वत्र शांतता पसरते. लॉकडाऊन शिथिल असल्यामुळे पोलिसांचाही फारसा बंदोबस्त नसतो. त्यामुळे रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे.

टॅग्स :Murderखून