शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सास्ती-गोवरी क्षेत्रात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: December 31, 2016 02:14 IST

राजुरा तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी सास्ती-गोवरी जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण असल्याने या क्षेत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जि.प. निवडणूक : उमेदवारी मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा गोवरी : राजुरा तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी सास्ती-गोवरी जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण असल्याने या क्षेत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कालपर्यंत या कार्यकर्त्यांना पक्षाचा काही लवलेशही नव्हता. ते कार्यकर्ते आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागायला लागले आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी उमेदवारांची लांबलचक यादी पहायला मिळत आहे. बहुतांश उमेदवार येथील स्थानिक रहिवासी असल्याने या क्षेत्राची निवडणूक चुरशीची होणार आहे. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली असून उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. सास्ती-गोवरी जि.प. क्षेत्रात बहुतांश भाग हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागात वेकोलि या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलिने परिसरात विकासकामे केली आहे. बहुतांश मतदार कोळसा खाणीत नोकरीवर असल्याने आर्थिक बाजू भक्कम आहे. परंतु नदी पड्यातील नागरिकांना अजूनही विकासकामांची आस लागली आहे. नदी पटयातील बहुतांश गावे आजही विकासापासून दूर असून गावात मूलभूत सोयी - सुविधांचा अभाव आहे. लोकप्रतिनिधींची उदासीनता जबाबदार असल्याचे आता नागरिकांकडून बोलले जात आहे. अक्षरश: ग्रामीण भागात विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी या भागाला मिळावा, अशी आशा नागरिक बाळगून आहे. येत्या काही दिवसात जि.प. निवडणुकींची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांच्या चाचपणीसाठी दिवसरात्र बैठका घेत आहे. कोणता उमेदवार पक्षासाठी सरस ठरेल, याचे राजकीय गणीत पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे. उमदेवारांनी आता मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. कधीही मतदारांकडे ढूंकूनही न पाहणारे उमेदवार मतदारांच्या सुखदु:खात सहभागी होताना दिसत आहे. सास्ती-गोवरी या क्षेत्राकडे सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच फिल्डींग लावली आहे. या क्षेत्रात भाजपातर्फे गोवरीचे विद्यमान सरपंच सुनिल उरकुडे, साखरीचे राजू घरोटे तर मधुकर नरड यांच्या नावाची चर्चा आहे. हे तीनही संभाव्य उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या गोटातील असल्याने हे पाहणे सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे. काँग्रेसकडून राजुरा काँग्रेस कमेटीची उमेदवारी कुणाला मिळेल, याबाबत मोठी चवीने चर्चा केली जात आहे. तालुका अध्यक्ष दादा पाटील लांडे, उमाकांत धांडे, बापू धोटे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. या भागात उमाकांत धांडे यांचा चांगला जनसंपर्क आहे. तर दादा पाटील लांडे मुळचे गोवरीचे असल्याने त्यांचा गोतावळा मोठा आहे आणि बापू धोटे यांचे पक्षसंघटन मोठे असल्याने या तिनही उमेदवारांनी तिकीटासाठी मोर्चेबांधनी सुरु केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान जि.प. सभापती सरिता कुडे या उमेदवारांसाठी पुढे आल्या आहेत. तर याच पक्षाकडून विजयालक्ष्मी रोगे व बबन उरकुडे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. शेतकरी संघटनेकडून बाबा पाटील कावळे, कवडू पोटे यांच्या नावाची चर्चा उमेदवारीसाठी चांगलीच रंगत आहे. हे दोन्ही याच क्षेत्रातील मूळ रहिवासी आहे. भाजपा, सेना, संघटना व काँग्रेस पक्षाकडून ज्या संभाव्य उमेदवारांची नावे पुढे येत आहे. ते बहुतेक उमेदवार कुणबी समाजातील आहे. त्यांचे नातेवसंबंध एकमेकांशी जुळले असल्याने उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींना चांगलाच घाम फूटणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही नवसे कार्यकर्तेही उमेदवारीसाठी पक्षाकडे चकरा मारत आहे. ही निवडणुक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात असली तरी सास्ती-गोवरी क्षेत्रातील संभाव्य उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी चांगलीच फिल्डींग लावली आहे. (वार्ताहर)