शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

उकीरड्यावरच्या जीवनात उजळला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:24 IST

समाजात आजही अनेक कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्या कुटुंबातील चिमुकले उकीरड्यावरील कचरा उचलून पोटाची खळगी भरतात.

ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : दिवाळीत दिला सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : समाजात आजही अनेक कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्या कुटुंबातील चिमुकले उकीरड्यावरील कचरा उचलून पोटाची खळगी भरतात. हा समाज आजही दुर्लक्षित, उपेक्षित आहे. अशाच बालकांच्या जीवनात आनंद देत त्यांचे उकीरड्यावरचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य येथील श्री लक्ष्मी नृसिंह पतसंस्था व संत गाडगेबाबा वाचनालयाने केले आहे. त्यांनी ऐन दिवाळीत सामाजिक बांधिलकीचा परिचय देत राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.दिवाळीत सर्वत्र हर्षोल्लासाचे वातावरण असते. नानाविध पदार्थांचा गोडवा प्रत्येकाच्या घरी असतो; मात्र परिस्थितीने हतबल झालेल्या व दारिद्रयात जीवन कंठत असलेल्या कुटुंबातील बालगोपाल या आनंदापासून दूर असतात. त्यांची सकाळ हातात पिशवी घेऊन सुरू होते. उकीरड्याचा शोध घेत प्लॉस्टिक व इतर वस्तू गोळा करण्याचा त्यांचा दिनक्रम नित्याचाच.शहराच्या गल्लोगल्लीतून भटकंती करून कचºयातील प्लॉस्टिक व इतर वस्तू गोळा करायच्या आणि त्या विकून पोटाची खडगी भरायची. शिक्षणाच्या प्रवाहापासूनही ही बालके दूर असतात.या चिमुकल्यांचा जीवनात एका दिवसापुरता का होईना, आनंद देण्याचा प्रयत्न येथील श्रीनिवास सुंचूवार यांनी केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उकीरड्यावर कचरा वेचणाºया चिमुकल्यांना त्यांनी एकत्र आणले.सामाजिक बांधिलकीतून या चिमुकल्यांना गोड घास भरविला. सर्व बालकांना नवे कपडे दिले. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते त्यांना विविध उपयोगी साहित्य देण्यात आले.श्री लक्ष्मी नृसिंह नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, डॉ. श्याम हिवरकर, रामजन्म चक्रवती, धीरज सुंचूवार, प्रकाश पवार, कुलदीप सुंचूवार, देवानंद रामटेके, रमेश चौधरी यांनी राबविलेला हा उपक्रम समाजात प्रेरणादायी ठरला आहे.