शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

आसोलामेंढा तलावाच्या नूतनीकरणाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:54 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आसोला मेंढा तलावाची उंची वाढविण्यासाठी बुडीत क्षेत्रातील सुमारे २९८.०२ हे. वनजमिनीची आवश्यकता आहे. मात्र वन कायद्याच्या अडथळ्याने या प्रकल्पाला लगाम लागला आहे.

ठळक मुद्देप्रकल्प १० वर्षे मागे : प्रस्ताव केंद्रीय वन प्रशासनाकडे धूळखात

उदय गडकरी।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आसोला मेंढा तलावाची उंची वाढविण्यासाठी बुडीत क्षेत्रातील सुमारे २९८.०२ हे. वनजमिनीची आवश्यकता आहे. मात्र वन कायद्याच्या अडथळ्याने या प्रकल्पाला लगाम लागला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून तो प्रस्ताव केंद्रीय वन प्रशासनाकडे धूळखात पडल्याची माहिती आहे. या कारणाने सदर प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आणखी १० वर्षे मागे जावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.आसोला मेंढा धरणाची उंची २.७ मीटरने वाढविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये बुडीत क्षेत्रातील सुमारे २९८.०२ हे.आर. इतकी वन जमीन लागणार आहे. याशिवाय मुख्य कालव्याच्या ० ते ३ कि.मी. अंतरापर्यंतच्या रुंदीकरणासाठीही वन जमिनीची आवश्यकता आहे. सदर वन जमीन ही वन प्रशासनाच्या तीन विभागात विभागली गेली आहे. यात विभागीय वनाधिकारी कार्यालय ब्रह्मपुरी १६९.८०९ हे., विभागीय वनाधिकारी कार्यालय, चंद्रपूर १०८.४४२ हे. तर विभागीय वनाधिकारी कार्यालय मध्य चांदा १९.८८ हे. अशी मिळून २९८.०२ हेक्टर वनजमीन सदर प्रकल्पाकरिता लागणार आहे.या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वनजमिनीचे मोजमाप वन विभाग व गोसेखुर्द प्रकल्पाच्या कार्यालयातर्फे संयुक्तपणे करण्यात आले आहे. मात्र वनविभागाकडून अजूनही प्रस्तावास मान्यता मिळाली नसल्याने आसोला मेंढा तलावाची उंची वाढविण्याचे आणि नहराच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. परिणामी शासनाने २०१९ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरणार की काय, अशी भीती वर्तविली जात आहे. शासनाने आतापर्यंत या प्रकल्पाची कोणतीच कामे केली नाही. आसोला मेंढा तलावाची क्षमता वाढविणे व मुख्य नहराचे रुंदीकरण केल्यास ५२ हजार ३६० हेक्टर सिंचन होणार आहे. आज प्रत्यक्षात केवळ नऊ हजार ९१९ हेक्टरचे सिंचन होत आहे.मी या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी या नात्याने आसोलामेंढा तलावाच्या कालव्याचे नुतनीकरण हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यातून मोठ्या प्रमाणात सिंचन होवून शेतकरी सुजलाम सुफलाम झालेला मला पाहायचा आहे. त्यात वन कायद्याच्या अडथळा असला तरी तो लवकरच निकाली निघणार असून त्यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. याशिवाय येत्या काही दिवसात किमान दीड हजार कोटींची कामे मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आसोलामेंढा तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामाला गती येईल.- आ. विजय वडेट्टीवार, सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रतथा विधीमंडळ उपगटनेता, मुंबई.