शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पाटणच्या राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज वाटपाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:25 IST

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ही बँक बंद असून तीन महिने लोटूनही अनेक शेतकऱ्यांची झोळी रिकामीच आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली बँक पंधरा दिवसांपासून बंद

फारूख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ही बँक बंद असून तीन महिने लोटूनही अनेक शेतकऱ्यांची झोळी रिकामीच आहे.जिवती तालुक्यात पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक असल्याने तालुक्यातील सर्वच शेतकरी या बॅकेतूनच पीक कर्ज घेतात. यासाठी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी प्रस्ताव दाखल केले. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून बँक बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. आर्थिक तंगीमुळे पेरणीची कामे खोळंबली असून अनेकांनी अवैध सावकारांची दारे ठोठावली आहेत. अवैध सावकारांनीही २५ टक्के इतक्या व्याज दराने शेतकºयांना पैसे वाटणे सुरू केल्याची माहिती आहे.शेतकºयांनी बँकेत सातबारा जमा केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी त्यांना ‘नो डू’ प्रमाणपत्र देण्यात आले. एकूण १७ बँकेचे ‘नो डू’ प्रमाणपत्र सादर केल्यानंतर आपल्याला कर्ज मिळेल व पेरणी करू शकणार, अशा आशेवर असणाºया शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून बँक बंद असल्याने चकरा मारावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.पैसे काढण्यात अडचणीतांत्रिक बिघाडामुळे पाटण येथील बँक गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. दरम्यान ज्यांचे पीक कर्ज मंजुर झाले व खात्यात रकम जमा झाली, अशा शेतकऱ्यांचे एटीएम व आधार लिंक नसल्याने दुसऱ्या बँकेतूनही पैसे काढता येत नाही. यामुळे अनेक शेतकरी बँक सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.निराधार नागरिकांचे हालतालुक्यातील अनेक निराधारांचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत. परंतु, बँक बंद असल्याने अनेक निराधार दररोज बँकेत येऊन परत जातात. ते सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकºयांना त्रास होवू नये यासाठी बँक लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पीक कर्ज वाटप करण्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- संजय धोटे, आमदार, राजुरा.