शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वर्धा नदीवरील ‘तो’ बंधारा तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:05 IST

वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे.

ठळक मुद्देपिण्याचे पाणी उद्योगाला : सात गावांच्या पाण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे निवेदन

चंद्रपूर : वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे. हा बंधारा येत्या सात दिवसात प्रशासनाने तोडावा, अन्यथा बंधारा तोडून फेकला जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष रजित मासीरकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना दिला आहे.वर्धा नदीवर बंधारा बांधल्यामुळे चिंचाळा, शेणगाव, सिदूर, वांढरी, वेंडली, पिपरी, धानोरा या सात गावांचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुम्हीही बंधारा बांधा, असा उलट सल्ला देत एकप्रकारे ग्रामीण जनतेचा अपनाम केला आहे. या बंधाºयामुळे सात गावातील २० हजार लोकांना पाणी पुरवठा बंद होत आहे. शासनाचे पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य असून नंतर शेती आणि शेवटी उद्योगाला पाणी देण्याचा नियम प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून उद्योगाला पाणी देण्याची मंजुरी कशी दिली, असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे.प्रशासनाने सात दिवसात बंधारा तोडावा अन्यथा संभाजी ब्रिगेड सातही गावाच्या लोकांना सोबत घेऊन बंधारा तोडून टाकेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन जिल्हाधिकारी, आ. नाना श्यामकुळे, तहसीलदार व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना देण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, तालुकाध्यक्ष रजिंत मासीरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश कांबळे, शेणगावचे अध्यक्ष मंगेश चटकी, कार्याध्यक्ष ओमेश्वर मेसेकर, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच डॉ. शरद रणदिवे, गुरुदेव सेवा मंडळचे पदाधिकारी पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आहे.