शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

ब्रह्मपुरी-वडसा राज्यमार्गाचे वर्षभरापासून भिजत घोंगडे

By admin | Updated: May 7, 2017 00:32 IST

वडसा व ब्रह्मपुरी ही दोन्ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. दररोज या एकमेव राज्य मार्गावरुन अनेक वाहने व हजारो नागरिक वाहतूक करीत असतात.

३०० मीटरचा रस्ता धूळ खात : अनेक प्रवाशांचा जीव मुठीतलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वडसा व ब्रह्मपुरी ही दोन्ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. दररोज या एकमेव राज्य मार्गावरुन अनेक वाहने व हजारो नागरिक वाहतूक करीत असतात. परंतु सुरबोडी गावाजवळ ३०० मीटरचा रस्ता गेल्या वर्षभरापासून रखडलेला असल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.वडसा - ब्रह्मपुरी या मार्गादरम्यान सुरबोडी गाव आहे. या गावाजवळ गोसीखुर्द कालव्याच्या पुलापासून वडसाकडे ३०० मीटर रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडलेले आहे. या राज्यमार्गावरुन भिलाई, रायपूर, चंद्रपूर, हैद्राबाद, नागपूर या दिशेने जड वाहनांची रात्रदिवस वाहतूक सुरू असते. तसेच ब्रह्मपुरी व वडसा या शहरांकडे कार्यालयीन कामाकरिता आणि बाजारपेठ, विद्यार्थी, शिक्षक, पालक व आरोग्याच्या दृष्टीने ब्रह्मपुरीत अनेक रुग्ण येत असतात. अशा सर्वांना जीव मुठीत घऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी अजूनही संबंधित कंत्राटदाराला जाग का येत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी कंत्राटदारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले. कंत्राटदार ऐकत नाही. उलट याबाबत हात वर केल्याचे बोलत असल्याने विभागासमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून हा रस्ता पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. या रोडवरुन जाताना धुळीने पूर्ण रस्ता दिसेनासा होत असतो. त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच महिला व बालकांच्या डोळ्यात व श्वसनक्रियेत धूळ जात असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वडसा - ब्रह्मपुरी राज्यमार्गात रखडलेले ३०० मीटरचे काम पूर्ण करावे, अशी हजारो नागरिकांची मागणी आहे.