शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

ब्रह्मपुरी-वडसा राज्यमार्गाचे वर्षभरापासून भिजत घोंगडे

By admin | Updated: May 7, 2017 00:32 IST

वडसा व ब्रह्मपुरी ही दोन्ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. दररोज या एकमेव राज्य मार्गावरुन अनेक वाहने व हजारो नागरिक वाहतूक करीत असतात.

३०० मीटरचा रस्ता धूळ खात : अनेक प्रवाशांचा जीव मुठीतलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वडसा व ब्रह्मपुरी ही दोन्ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. दररोज या एकमेव राज्य मार्गावरुन अनेक वाहने व हजारो नागरिक वाहतूक करीत असतात. परंतु सुरबोडी गावाजवळ ३०० मीटरचा रस्ता गेल्या वर्षभरापासून रखडलेला असल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.वडसा - ब्रह्मपुरी या मार्गादरम्यान सुरबोडी गाव आहे. या गावाजवळ गोसीखुर्द कालव्याच्या पुलापासून वडसाकडे ३०० मीटर रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडलेले आहे. या राज्यमार्गावरुन भिलाई, रायपूर, चंद्रपूर, हैद्राबाद, नागपूर या दिशेने जड वाहनांची रात्रदिवस वाहतूक सुरू असते. तसेच ब्रह्मपुरी व वडसा या शहरांकडे कार्यालयीन कामाकरिता आणि बाजारपेठ, विद्यार्थी, शिक्षक, पालक व आरोग्याच्या दृष्टीने ब्रह्मपुरीत अनेक रुग्ण येत असतात. अशा सर्वांना जीव मुठीत घऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी अजूनही संबंधित कंत्राटदाराला जाग का येत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी कंत्राटदारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले. कंत्राटदार ऐकत नाही. उलट याबाबत हात वर केल्याचे बोलत असल्याने विभागासमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून हा रस्ता पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. या रोडवरुन जाताना धुळीने पूर्ण रस्ता दिसेनासा होत असतो. त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच महिला व बालकांच्या डोळ्यात व श्वसनक्रियेत धूळ जात असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वडसा - ब्रह्मपुरी राज्यमार्गात रखडलेले ३०० मीटरचे काम पूर्ण करावे, अशी हजारो नागरिकांची मागणी आहे.