शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा

By admin | Updated: October 30, 2015 01:14 IST

तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील शेतजमिनीवरील पिकांचे सर्वेक्षण करून सुधारित पैसेवारीत समाविष्ट करून तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा,...

ब्रह्मपुरी : तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील शेतजमिनीवरील पिकांचे सर्वेक्षण करून सुधारित पैसेवारीत समाविष्ट करून तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात १०४९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. परंतु सरासरी पर्जन्यमानापेक्षा ३० ते ४० टक्के पाऊस यावर्षी कमी झाला आहे. कमी पावसामुळे काही रोवणी अजूनही खोळंबलेली आहे. काही आवत्या व रोवण्या विहीर पंप व कमी पावसाच्या भरवश्यावर करण्यात आल्या. हलक्या धानाला कमी पाऊस लागत असल्याने त्याने कसे तरी तग धरले. परंतु जड धानाला कमी पाऊस जड जात आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कोसोदूरवरुन पाणी आणून जड धानाला जगविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले आहे. तरी उत्पन्न मात्र ५० टक्केच्या वर जाईल, याची शास्वती नाही. त्यामुळे संबंध तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी सर्वाची मागणी आहे. परंतु १९९९ ला शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी काही निकष ३० वर्षापूर्वीचे असल्याने घोषित होण्यासाठी आडकाठी येत असते. शासनाने १९९९ ला पैसेवारीचे तीन प्रकार पाडून त्यामध्ये जो भाग समाविष्ट असेल, त्या गटात मोडला जाते. सुधारित पैसेवारी व अंतिम पैसेवारी अशा तीन प्रकारापैकी ब्रह्मपुरी तालुका नजरअंदाज पैसेवारीत ५७ टक्के प्रमाणात समाविष्ठ आहे. परंतु यानंतर शासनाचे प्रतिनिधी पुन्हा पिकांचे सर्वेक्षण करून १५ नोव्हेंबरपर्यंत सुधारित पैसेवारी जाहीर करणार असल्याने सुधारित पैसेवारीमध्ये शेतपिकांचे योग्य सर्वेक्षण करून ब्रह्मपुरी तालुका त्यात समाविष्ठ करावा व संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी, लोकप्रतिनिधी आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)