शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

ब्रह्मपुरी-नागभीड महामार्ग भोगतो आहे मरणयातना

By admin | Updated: January 24, 2017 00:46 IST

केंद्रीय रस्ते निर्माण मंत्रालय विभागाने राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर केलेला ब्रह्मपुरी-नागभीड मार्ग जागोजागी खड्डे, अरूंद रस्ता व जीवघेणी रहदारीमुळे मरणयातना भोगत आहे.

राष्ट्रीय महामार्ग नावापुरते : ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षाब्रह्मपुरी : केंद्रीय रस्ते निर्माण मंत्रालय विभागाने राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर केलेला ब्रह्मपुरी-नागभीड मार्ग जागोजागी खड्डे, अरूंद रस्ता व जीवघेणी रहदारीमुळे मरणयातना भोगत आहे.पूर्वी हा रस्ता राज्य मार्ग असताना बांधकाम विभागाचे लक्ष असायचे. त्यामुळे लगेच त्यावर निदान डाकडूगी केली जात होती. आता या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याने याचा वाली कोणीच नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी नागभीडला येऊन गेले. त्यांनी रस्त्यांचा विकास म्हणजे ग्रामीण व शहरी भागाचा विकास असल्याचे भाषणात सांगितले. परंतु त्यांच्या या वक्त्यानुसार या राष्ट्रीय महामार्गाला ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, याचा मात्र थांगपत्ता नाही. या रस्त्यावरून लहान - मोठी वाहने अहोरात्र धावत असतात. रस्त्याला जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते. प्रसंगी खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही बांधकाम विभागाचे लक्ष का जात नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम जेव्हा सुरू होईल तेव्हाच हा रस्ता बनेल, असे धोरण असेल तर किमान त्यांच्या योग्य दुरूस्तीकडे लक्ष देऊन त्याला व वाहनांच्या हालअपेष्टांना तूर्त वाट करून देण्याचेही सौजन्य संबंधित विभागाकडून केले जात नसल्याने वाहनधारकांचा रोष निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी शहराच्या देलनवाडीपासून ख्रिस्तानंद चौकापर्यंत अनेक शाळेकरी विद्यार्थी सायकलने, महिला वर्ग मोटरसायकल व पायी जात असताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. रस्त्याची रहदारी लक्षात घेऊन प्राथमिकता देण्याचे सौजन्यही संबंधित विभागाला होत नसेल तर केवळ वेतनासाठीच कर्मचाऱ्यांचे काम असले पाहिजे, असाही खोचक सवाल नागरिकांकडून केला जात आहे. यापेक्षा हा रस्ता पूर्वी राज्यमार्ग होता तेच बरे होते, असेही बोलले जात आहे. खासदार नेते यांनी या समस्येची दखल घेऊन किमान या रस्त्याला मरणयातनेतून सोडविण्याची मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)