शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बोरघाट उपसा सिंचनच्या पाण्यासाठी शेतकºयांनी फोडला टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:52 IST

मूल तालुक्यातील बोंडाळा (बुज) हे गाव बोरघाट लिप्टच्या मुख्य प्रवाहात येत असून साज्यातसुद्धा अंतर्भूत आहे. परंतु याच गावच्या शेतकºयांना शेतीपिकासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळत नाही.

ठळक मुद्देसिंचन विभागाला निवेदन : बोंडाळा बुज. येथील शेतकºयांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवाडा बुज : मूल तालुक्यातील बोंडाळा (बुज) हे गाव बोरघाट लिप्टच्या मुख्य प्रवाहात येत असून साज्यातसुद्धा अंतर्भूत आहे. परंतु याच गावच्या शेतकºयांना शेतीपिकासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यांना सिंचन सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. शेतकरी जिवाचा आकांताने टाहो फोडत असले तरी संबंधित विभाग मात्र मूग गिळून बसला आहे.बोंडाळा बुज येथील विद्यमान सरपंच योगेश शेरकी यांच्या नेतृत्वात शेतकºयांसह नुकतेच शाखा अभियंता सिंचन विभाग शाखा नांदगाव (बेंबाळ) यांना निवेदन सादर करून पाणी टंचाईची समस्या मांडण्यात आली.यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मु. आ. कांजणे, पाटबंधारे उपविभाग सावलीचे उपविभागीय अभियंता र. सु. रणदिवे, कालवा निरीक्षक पी.डी. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. बोंडाळा बुज या गावातील ३०० हेक्टर शेती पिकाच्या लागवडीखाली येत असून शेतीमध्ये धान व कापूस हे पीक उभे आहे. परंतु शेतात उभे पीक असताना शेतीसाठी मात्र पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे उभे पीक जलसंकटात कोसळेल काय, अशी भीती शेतकºयांमध्ये वर्तविली जात आहे. सिंचनाची सोय नसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. पाण्याच्या उपाययोजनेसाठी गावालगत पाटाचे खोदकाम करण्यात आले होते. परंतु पाणी पुरत नसल्याचे कारण समोर ढकलून सदर गावाला सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचाही आरोप शेतकºयांकडून केला जात आहे. खोदकाम करून केवळ देखावा निर्माण केला काय, असा सवालही शेतकºयांकडून विचारला जात आहे.सिंचन उपाययोजनेचे पाणी शेतीला मिळत नसल्याने शेतकºयांची पिके करपली जावून नापिकीची परिस्थिती ओढवणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग सध्या चिंताग्रस्त झाला आहे.बोरघाट उपसा जलसिंचन योजना यावर्षी सन २०१७-१८ मध्ये सुरू झाली असून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. सद्यस्थितीत तीनपैकी एक पंप सुरू आहे. आजतागायत पाण्याचे नियोजन करून उर्वरित गावांना पाणी पोहचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत.- मु.आ. कांजुणे, शाखा अभियंता, सिंचन शाखा बेंबाळ, नांदगाव