शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

शासनाने दिली ‘त्या’ कर्मचाऱ्यांना मायेची ऊब

By admin | Updated: April 1, 2015 01:17 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत मागील वर्षी कंत्राटी पद्धतीने अस्थाई स्वरूपात वैद्यकीय अधीक्षकासह चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती.

खडसंगी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत मागील वर्षी कंत्राटी पद्धतीने अस्थाई स्वरूपात वैद्यकीय अधीक्षकासह चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र या कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र शासनाने या कंत्राटी अस्थाई कर्मचाऱ्यांना २५ मार्चच्या निर्णयानुसार मुदत वाढ देऊन मायेची ऊब दिली आहे.राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून शासनाने तालुका स्तरापासून मोठ्या गाापर्यंत आरोग्याच्या सेवा पुरविल्या आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या केंद्रातून नागरिकांच्या आरोग्यावर उपचार करण्यात येतात. शासनाच्या धोरणानुसार या आरोग्य सुविधा देण्याकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत सोई-सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा देण्याकरिता शासनाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने शासनाने बऱ्याच कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी ग्रामीण भागात गावागावांत जाऊन आरोग्य सुविधा नागरिकांना देऊन आरोग्याची काळजी घेतात.चिमूर येथे मागील वर्षी उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली. त्यानुसार या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा शासनाने घेतली होती. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) वैद्यकारी बालरोग, नेत्र शल्यचिकित्सक, दंत चिकित्सकापासून परिचारिका, शिपायापर्यंत अशा ७० कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती केले. या कर्मचाऱ्यांना शासनाने १ मार्च २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे त्यांच्यामध्ये मार्च २०१५ पासून कामावरुन कमी करण्याची भीती निर्माण झाली होती.सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर मंडळ नागपूर यांच्या अधिपत्याखाली उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील ७० अस्थाई पदांना शासनाने २५ मार्चच्या निर्णयानुसार १ मार्च २०१५ ते २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील ७० अस्थाई कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून शासनाच्या या निर्णयामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड ओढावलेल्या कर्मचाऱ्यांना मायेची ऊब मिळाली आहे. (वार्ताहर)