शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

साहित्य महोत्सवात ग्रंथ विक्रेत्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच्या सहयोगातून साहित्य संमेलने आयोजित करताना विदर्भ साहित्य संघासारखी प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्यास सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात.

ठळक मुद्देवाचकांनी फिरवली पाठ : दर्जेदार संपदा असतानाही अडीच लाखांचीच ग्रंथविक्री

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चांदा क्लब चंद्रपूर व विदर्भ साहित्य संघ नागपूरतर्फे चांदा क्लब ग्राऊंडवरील साहित्य संस्कृती महोत्सवादरम्यान रसिकांनी फारशी गर्दी केली नाही. त्यामुळे केवळ अडीच लाखांचीच ग्रंथविक्री झाली. पुणे, सोलापूर, औरंगाबाद सारख्या लांब अंतरावरील ग्रंथ विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते.मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच्या सहयोगातून साहित्य संमेलने आयोजित करताना विदर्भ साहित्य संघासारखी प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्यास सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात. चंद्रपुरातील संमेलनाला तर थेट सांस्कृतिक महोत्सवाची जोड दिली होती. त्यामुळे गर्दी जमेल अशी ग्रंथ विक्रेत्यांना आशा होती. चार विक्रेत्यांना तर प्रवास खर्चही निघाला नाही. पुस्तकांच्या दुकानातून कापडी कोट विकल्याने बरे झाले, अशी माहिती एकाने दिली. ग्रंथदालनातील एका दुकानातून काहींनी चक्क हळदीची पाकिटे विकत घेतल्याचे पाहून आश्चर्य वाटल्याचे श्रीकांत साव यांनी सांगितले.वैचारिक ग्रंथांना सर्वाधिक पसंतीवाचकांनी ललितऐवजी वैचारिक ग्रंथांची सर्वाधिक खरेदी केली. कथा, कविता, कांदबरी व आत्मकथनाची पुस्तके विकली नाहीत. वर्तमानातील अस्वस्थ प्रश्नांना भेडणारे विषय वाचकांना आकर्षित करत असल्याचे निरीक्षण पुण्याच्या राजहंस प्रकाशनाचे शरद अष्टेकर यांनी नोंदविले.आयोजकांचे चुकले कुठे?सोलापुरातील विजय बुक सर्व्हिसेसचे राजन देडे म्हणाले, संमेलनाची तयारी डौलदार होती. मात्र, शासकीय सरस महोत्सादरम्यान लावलेले स्टॉल्स जैसे थे ठेवून ग्रंथ विक्रेत्यांना वेगळी जागा दिली. सरसच्या जागेवर चहा, नाश्त्याची दुकाने लागली. त्यामुळे बरेच रसिक कार्यक्रम पाहून घेऊन थेट सरस स्टॉलकडेच जायचे. संमेलन, ग्रंथदालन व नाश्ता अशा घटकांना एकत्र ठेवणे शक्य होते. औरंगाबादचे बी. आर. काळे यांनी रसिकांची गर्दी न होण्यामागे संमेलनाचा प्रचार व प्रसार कमी पडला, अशी शंका व्यक्त केली.फिरकले नाहीत विद्यार्थीपुसद येथील विद्याधनचे अशोक गोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी १२ प्रकारचे नकाशे तयार केले. विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा कल लक्षात घेऊन निर्मिलेल्या ज्ञानवर्धक शैक्षणिक साहित्याने पालक व शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. वाचन लेखनाचे उत्तम संस्कार बालमनावर रूजविण्यासाठी साहित्य संमेलन उत्सव उत्सव असतो. पण संमेलनात पहिला दिवस सोडल्यास मुले फिरकली नाही, अशी खंत गोरे यांनी व्यक्त केली.