शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

साहित्य महोत्सवात ग्रंथ विक्रेत्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच्या सहयोगातून साहित्य संमेलने आयोजित करताना विदर्भ साहित्य संघासारखी प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्यास सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात.

ठळक मुद्देवाचकांनी फिरवली पाठ : दर्जेदार संपदा असतानाही अडीच लाखांचीच ग्रंथविक्री

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चांदा क्लब चंद्रपूर व विदर्भ साहित्य संघ नागपूरतर्फे चांदा क्लब ग्राऊंडवरील साहित्य संस्कृती महोत्सवादरम्यान रसिकांनी फारशी गर्दी केली नाही. त्यामुळे केवळ अडीच लाखांचीच ग्रंथविक्री झाली. पुणे, सोलापूर, औरंगाबाद सारख्या लांब अंतरावरील ग्रंथ विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते.मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच्या सहयोगातून साहित्य संमेलने आयोजित करताना विदर्भ साहित्य संघासारखी प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्यास सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात. चंद्रपुरातील संमेलनाला तर थेट सांस्कृतिक महोत्सवाची जोड दिली होती. त्यामुळे गर्दी जमेल अशी ग्रंथ विक्रेत्यांना आशा होती. चार विक्रेत्यांना तर प्रवास खर्चही निघाला नाही. पुस्तकांच्या दुकानातून कापडी कोट विकल्याने बरे झाले, अशी माहिती एकाने दिली. ग्रंथदालनातील एका दुकानातून काहींनी चक्क हळदीची पाकिटे विकत घेतल्याचे पाहून आश्चर्य वाटल्याचे श्रीकांत साव यांनी सांगितले.वैचारिक ग्रंथांना सर्वाधिक पसंतीवाचकांनी ललितऐवजी वैचारिक ग्रंथांची सर्वाधिक खरेदी केली. कथा, कविता, कांदबरी व आत्मकथनाची पुस्तके विकली नाहीत. वर्तमानातील अस्वस्थ प्रश्नांना भेडणारे विषय वाचकांना आकर्षित करत असल्याचे निरीक्षण पुण्याच्या राजहंस प्रकाशनाचे शरद अष्टेकर यांनी नोंदविले.आयोजकांचे चुकले कुठे?सोलापुरातील विजय बुक सर्व्हिसेसचे राजन देडे म्हणाले, संमेलनाची तयारी डौलदार होती. मात्र, शासकीय सरस महोत्सादरम्यान लावलेले स्टॉल्स जैसे थे ठेवून ग्रंथ विक्रेत्यांना वेगळी जागा दिली. सरसच्या जागेवर चहा, नाश्त्याची दुकाने लागली. त्यामुळे बरेच रसिक कार्यक्रम पाहून घेऊन थेट सरस स्टॉलकडेच जायचे. संमेलन, ग्रंथदालन व नाश्ता अशा घटकांना एकत्र ठेवणे शक्य होते. औरंगाबादचे बी. आर. काळे यांनी रसिकांची गर्दी न होण्यामागे संमेलनाचा प्रचार व प्रसार कमी पडला, अशी शंका व्यक्त केली.फिरकले नाहीत विद्यार्थीपुसद येथील विद्याधनचे अशोक गोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी १२ प्रकारचे नकाशे तयार केले. विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा कल लक्षात घेऊन निर्मिलेल्या ज्ञानवर्धक शैक्षणिक साहित्याने पालक व शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. वाचन लेखनाचे उत्तम संस्कार बालमनावर रूजविण्यासाठी साहित्य संमेलन उत्सव उत्सव असतो. पण संमेलनात पहिला दिवस सोडल्यास मुले फिरकली नाही, अशी खंत गोरे यांनी व्यक्त केली.