शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शिवाजी वाॅर्डात पाच दिवसांपासून पाण्यासाठी बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

बल्लारपूर : शिवाजी वॉर्डातील बीटीएस प्लांटकडे जाणाऱ्या मार्गावर मागील चार दिवसापासून नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. बीटीएस प्लांट चौकातील ...

बल्लारपूर : शिवाजी वॉर्डातील बीटीएस प्लांटकडे जाणाऱ्या मार्गावर मागील चार दिवसापासून नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे.

बीटीएस प्लांट चौकातील व्यवसायी शेख बबलू यांनी सांगितले की, मागील पाच दिवसापासून आमच्याकडे पाणीच नाही, तर अनेक भागात पाणी येत नसल्याच्या नळधारकांच्या तक्रारी आहेत. शिवाजी वॉर्ड रहिवासी तेजिंदरसिंग दारी यांनी सांगितले की, सकाळी पाण्यासाठी लवकर उठावे लागते व फक्त अर्धा तासच पाणी मिळते. त्यानंतर नळाची धार कमी झाल्यामुळे पाणी मिळत नाही. डेपो विभागातील अनेक नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी आहे. पाण्याची तक्रार करण्यासाठी शाखा अभियंता येरणे यांना फोन केला असता ते फोनच उचलत नाही, अशा तक्रारी नळ ग्राहकांच्या आहे. डेपो विभागात जुन्या पाईपलाईनमधून पाण्याची नासाडी होत आहे. यामुळे नवीन पाईप लाईनमधून नळ ग्राहकांना पाणी मिळत नसल्यामुळे जुनी पाईप लाईन त्वरित बंद करावी, अशी नळ ग्राहकांची मागणी आहे.