शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

जिल्ह्यात बोगस शाळांचा सुळसुळाट

By admin | Updated: June 26, 2014 23:09 IST

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बोगस शाळांचा सुळसुळाट झाला असून यात इंग्रजी शाळांचे प्रमाण जास्त आहे. संस्थाचालकांना पैसा कमाविण्याचा मोह आवरत नसल्यामुळे शिक्षण विभागातील

शाळा बनल्या कमाईचे साधन : अधिकाऱ्यांकडून मात्र पाठराखणचंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बोगस शाळांचा सुळसुळाट झाला असून यात इंग्रजी शाळांचे प्रमाण जास्त आहे. संस्थाचालकांना पैसा कमाविण्याचा मोह आवरत नसल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत मिलिभगत करुन हा गोरखधंदा सुरू आहे. यामध्ये मात्र विद्यार्थी व पालक शैक्षणिकृदृष्ट्या भरडल्या जात आहेत.बोगस शाळांमध्ये प्रवेश घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागल्याच्या जिल्ह्यात अनेक घटना घडल्या. तरीसुद्धा शिक्षण विभागाची झोप उघडली नसल्याचे वास्तव आहे. आजघडीला जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस शाळा सुरू असताना शिक्षण विभाग डोळे बंद करुन आहे. तालुकास्तरावरील शिक्षण विभागाचे अधिकारी चिरीमिरी घेऊन अशा शाळांना अभय देत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे पालक मात्र यापासून अनभिज्ञ आहे.शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात संस्था चालकांना पत्र पाठविले होते. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जे शिक्षण देशाचा आधारस्तंभ घडविते, ते शिक्षण देणाऱ्या संस्थाच अवैधरित्या शिक्षण देत असेल तर समाज घडवण्याची अपेक्षा नागरिकांनी कोणाकडून करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध शाळांची अद्ययावत यादी सुद्धा मिळणे कठीण आहे. कारण तालुका स्तरावरच अशा शाळांना चिरिमीरी घेऊन अभय देण्यात येत आहे.अवैध शाळा चालविणाऱ्या संस्था चालकांकडून संबंधित विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी १० ते १५ हजारांपर्यंत रक्कम घेऊन अशा शाळांची पाठराखण करताना दिसतात. संस्थाचालकांना शाळा बंद करण्याच्या सल्ला न देता तुम्ही चालवा आम्ही पाहून घेऊ, असे सांगून दिलासा संस्था चालकांना दिलासा देतात. यावर अंकुश आणून अशा शाळांवर कारवाई करण्याची गरज आहे. दहा संस्थाचालकांना जगविण्यासाठी शिक्षण विभाग शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळत असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)