शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: October 25, 2014 22:37 IST

पोंभुर्णा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या बोगस डॉक्टरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बोगस डॉक्टरांच्या व्यवसायामुळे ग्रामीण परिसरातील

देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या बोगस डॉक्टरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बोगस डॉक्टरांच्या व्यवसायामुळे ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.ग्रामीण भागात जनतेच्या आरोग्याशी संबंधित शासनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे अशा बोगस डॉक्टरांकडेच जनतेला उपचाराकरिता जावे लागते. राज्यात कोठेही वैद्यकीय व्यवसाय करावयाचा झाल्यास इंडियन मेडीकल असोसिएशन या संघटनेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु असे कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र नसताना बरेच बोगस डॉक्टर आपला व्यवसाय करीत आहेत. तर काही डॉक्टर शहरातील डॉक्टरांकडे कंपाऊडर म्हणून नोकरी करुन नंतर ग्रामीण परिसरामध्ये येऊन आपला स्वत:चा व्यवसाय करीत आहेत. अशा डॉक्टरांना कोणत्या औषधीचे काय परिणाम होतात. कोणत्या औषधीवर शासनाने बंदी घातली आहे, याची त्यांना माहिती नसते. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर ग्रामीण भागात अनधिकृतपणे मुळव्याध, भगंदर यासारख्या रोगांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करीत आहेत. काही डॉक्टर बॉम्बे मार्केटच्या दुय्यम दर्जाच्या औषधीचा वापर करुन लालसेपोटी मोठ्या प्रमाणात पैसा कमविण्याचा गोरखधंदा करीत आहेत. बऱ्याच ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर मोहीम राबविली आहे. परंतु पोंभुर्णा तालुक्यात मात्र शासनाने बोगस डॉक्टरांना व्यवसाय करण्यासाठी मोकाट सोडल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागात शासनाच्या वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. विविध भागातील आरोग्य केंद्रामध्ये तथा उपकेंद्रामध्ये डॉक्टर, कर्मचारी तथा औषधसाठा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध राहत नाही. त्यामुळे स्थानिक परिसराततील रुग्णांना अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांकडून नाईलाजास्तव उपचार करवून घ्यावा लागतो. त्यामुळे परिसरात अवैध धंदा करणाऱ्या डॉक्टरांचा व्यवसाय फोफावत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार, डोंगरहळदी तुकूम, सातारा तुकूम, जामखुर्द, जामतुकूम, देवाडा खुर्द, येरगाव, पोंभुर्णा, नवेगाव मोरे, चिंतलधाबा, चेकहलीबोडी, बोर्डा वेळवा या ठिकाणी बोगस व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे. (वार्ताहर)