शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

जिल्ह्यात २०० वर बोगस डॉक्टर

By admin | Updated: May 23, 2014 23:43 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावीत, या दृष्टिकोनातून शासनाने तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय तर, तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात आरोग्य उपकेंद्राची

चंद्रपूर: ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावीत, या दृष्टिकोनातून शासनाने तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय तर, तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात आरोग्य उपकेंद्राची स्थापना केली आहे. शासनाने ज्या उद्देशाने शासकीय रुग्णसेवा सुरू केली. त्याच उद्देशाला दुसरीकडे हरताळ फासत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ते रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत दोनशेच्या वर बोगस डॉक्टर असल्याची शासन दरबारी नोंद आहे. मात्र कारवाई करण्यास प्रशासन उदासिन असल्याचे दिसते. ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा ही नित्याचीच बाब झाली आहे. सोबतच अपुरा कर्मचारी अत्याधुनिक सोयीसुविधा नाही. हिच स्थिती प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे.बर्‍याच उपकेंद्रातील उपकेंद्रातील परिचारीकाही वेळेवर हजर राहत नाही. त्यामुळे त्या परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू होते. परिणामत: ग्रामीण भागातील रुग्णांना खिशाला आर्थिक कात्री लावत खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तर, अनेक गावात उपकेंद्र आहेत. मात्र ग्रामीण रूग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमित औषध पुरवठा, कर्मचारर्‍यांची कमतरता व अत्याधुनिक सुविधा आणि वैद्यकीय अधिकार्‍यांनी रिक्त पदे यामुळे शासकीय रुग्णसेवा पुर्णत: ढासळली आहे. याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र नसतानाही जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे बोगस डॉक्टरांनी रुग्णालय थाटले आहेत. बोगस डॉक्टरांकडे जाणार्‍या रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुट करण्यात येत आहे. मात्र नाईलाजाने रुग्णांना बोगस डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. काही बोगस डॉक्टर एजंटसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी दवाखाण्याच्या समोर बोर्ड लाऊन थेट दवाखान्याच व्यवसाय थाटला आहे. सध्या जिल्ह्यात २१५ च्यावर बोगस डॉक्टर असल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बोगस डॉक्टरांवर पायबंद घालण्याची मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना केवळ मोठ्या शहरामध्ये चार ते पाच वर्ष परिचर म्हणून काम केल्याच्या अनुभवाखाली बहुतांश नागरिकांनी स्वत:चे रुग्णालय थाटले आहे. सर्दी, खोकला, ताप या आजारांवर उपचार करून सर्रास नागरिकांची लूट केली जात आहे. गंभीर रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यास रुग्णांची थातुरमातुर तपासणी करून त्यांना दुसर्‍या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. चंद्रपूर, कोरपना, चिमूर, पोंभूर्णा, जिवती, राजुरा अन्य तालुक्यातील गावांमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या जास्त प्रमाणात आहे.(नगर प्रतिनिधी)