शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

चंद्र्रपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर अवतरली निळाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

भंते ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय व सुखमय होण्यासाठी मनाची शुद्धी आवश्यक आहे. धम्म विचारात वैज्ञानिक दृष्टी आहे. त्यामुळेच हा विचार वैश्विक झाला. भंते कृपाशरण म्हणाले, बुद्धाचा धम्म माणसाने माणसावर प्रेम करायला शिकवितो.

ठळक मुद्देधम्मज्योत लक्षवेधी : धम्मचक्र अनुप्रवर्तन समारोहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांचा अंधार दूर करून उपेक्षित व वंचितांना प्रकाशाचा मार्ग दाखविला. विषमतेच्या बेड्या तोडून अस्मिता जागवली. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाने प्रगतीच्या दिशा दाखविल्या. बौद्ध धम्म क्रांतीने तर नवा इतिहास घडविला. बाबासाहेबांनी चंद्रपुरात लाखो जनतेला बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. या ऐतिहासिक दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात मंगळवारी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. सायंकाळी पाच वाजता शहरात निघालेली विश्वशांती धम्मज्योत रॅली नागरिकांसाठी लक्षवेधी ठरली.अध्यक्षस्थानी अरूण घोटेकर तर प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते विश्वशांतीचा संदेश देणारा पंचरंगी बलून आकाशात सोडण्यात आला. यावेळी भंते कृपाशरण, भंते शिलानंद वर्धा, भंते आर्यसुत्त नागपूर, भंते सरणकर नागपूर, भिक्खुनी खेमा, सचिव वामनराव मोडक, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर आदींची उपस्थित होती.भंते ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय व सुखमय होण्यासाठी मनाची शुद्धी आवश्यक आहे. धम्म विचारात वैज्ञानिक दृष्टी आहे. त्यामुळेच हा विचार वैश्विक झाला. भंते कृपाशरण म्हणाले, बुद्धाचा धम्म माणसाने माणसावर प्रेम करायला शिकवितो. मानवाच्या विकासाकरिता धम्माचे पालन केले पाहिजे. भंते शिलानंद म्हणाले, या देशात समता स्वातंत्र्य व लोकशाही निर्माण करण्यासाठी बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला. अध्यक्ष घोटेकर यांनी समारंभाचे महत्त्व विशद केले. संचालन प्रा. रवी कांबळे यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ‘क्रांतीज्योती’ महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अभिनयसुत्रम अ‍ॅक्टींग क्लासेसने लघु नाटिका सादर केली. हेमंत शेंडे व संचाने ‘जागर समतेचा’ या कार्यक्रमाद्वारे प्रबोधन केले. स्फुर्ती गीत सादर केली. त्यानंतर भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांनी उपस्थित जनसमुहाला त्रिशरण व पंचशील दिले. संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.देशभरातील वैचारिक ग्रंथसंपदाधम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात विविध विषयांच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील पुस्तक विक्रेते यंदाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यंदा भोजन व दुकानाचे स्टॉल चांदा क्लब ग्राउंडवर लागले आहेत.आजचे कार्यक्रम१६ आॅक्टोबर रोजी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशासह बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत धम्मरॅलीनिघणार आहे. सकाळी ९ वाजता ‘धम्मक्रांती व धम्मदीक्षेची प्रासंगिकता’ विषयावर परिसंवाद होणार आहे. यावेळी भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई, भंते धम्मसारथी, भंते नागवंशा, भंते धम्मप्रकाश आदी विचार मांडतील. सायंकाळी ५ वाजता मुख्य सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थानी अरूण घोटेकर व प्रमुख पाहुणे निवृत्त सनदी अधिकारी श्याम तागडे, भंते ज्ञानज्योती महास्थवीर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. आनंद भालेराव, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र लेंडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव उपस्थित राहतील. रात्री ९ वाजता गायिका वैशाली माडे बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणार आहेत.