शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

रक्तपेढी आक्सिजनवर, दोन दिवस पुरेल एवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच उन्हाळ्याच्या ...

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताची अधिक गरज आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज ३० ते ४० बॅगची गरज आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते. विशेष म्हणजे, सिकलसेल, रक्तक्षय, थैलिसिमिया, शस्त्रक्रिया, प्रसूती या रुग्णांनाही रक्त द्यावे लागते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या रक्तपेढीवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढावा यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे.

बाॅक्स

१० ते ४ पर्यंत करू शकता रक्तदान

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील रक्तपेढीमध्ये १० ते ४ वाजेपर्यंत रक्तदान करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही येथे येऊन रक्तदान करता येते. रक्तदानामुळे दुसऱ्या एखाद्याचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे स्वमर्जीने येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

कोट

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्येही सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत येऊन रक्तदान करता येते. मनात गैरसमज न ठेवता सर्वांनी रक्तदान करावे

-डाॅ. अनंत हजारे

रक्तसंक्रमण अधिकारी, चंद्रपूर

बाॅक्स

लस घेण्यापूर्वी रक्तदान करा

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम राबिवली जात आहे. त्यामुळे रक्तदानावरही याचा परिणाम होत आहे. नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर उहाय म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करणे हाच पर्याय आहे.