शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रक्तपेढी आक्सिजनवर, दोन दिवसाच रक्त साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज ३० ते ४० बॅगची गरज आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते.  विशेष म्हणजे, सिकलसेल, रक्तक्षय, थैलिसिमिया, शस्त्रक्रिया, प्रसूती या रुग्णांनाही रक्त द्यावे लागते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या रक्तपेढीवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देदात्यांनो रक्त द्या : रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताची अधिक गरज आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज ३० ते ४० बॅगची गरज आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते.  विशेष म्हणजे, सिकलसेल, रक्तक्षय, थैलिसिमिया, शस्त्रक्रिया, प्रसूती या रुग्णांनाही रक्त द्यावे लागते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या रक्तपेढीवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढावा यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, ६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० ते ४ पर्यंत करू शकता रक्तदानयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील रक्तपेढीमध्ये १० ते ४ वाजेपर्यंत रक्तदान करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही येथे येऊन रक्तदान करता येते. रक्तदानामुळे दुसऱ्या एखाद्याचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे स्वमर्जीने येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्येही सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत येऊन रक्तदान करता येते. मनात गैरसमज न ठेवता सर्वांनी रक्तदान करावे-डाॅ. अनंत हजारे, रक्तसंक्रमण अधिकारी, चंद्रपूर

लस घेण्यापूर्वी रक्तदान कराकोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम राबिवली जात आहे. त्यामुळे रक्तदानावरही याचा परिणाम होत आहे. नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून  रक्तदान करणे हाच पर्याय आहे.

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी