शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रक्तपेढी आक्सिजनवर, दोन दिवसाच रक्त साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज ३० ते ४० बॅगची गरज आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते.  विशेष म्हणजे, सिकलसेल, रक्तक्षय, थैलिसिमिया, शस्त्रक्रिया, प्रसूती या रुग्णांनाही रक्त द्यावे लागते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या रक्तपेढीवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देदात्यांनो रक्त द्या : रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताची अधिक गरज आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज ३० ते ४० बॅगची गरज आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते.  विशेष म्हणजे, सिकलसेल, रक्तक्षय, थैलिसिमिया, शस्त्रक्रिया, प्रसूती या रुग्णांनाही रक्त द्यावे लागते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या रक्तपेढीवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढावा यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, ६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० ते ४ पर्यंत करू शकता रक्तदानयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील रक्तपेढीमध्ये १० ते ४ वाजेपर्यंत रक्तदान करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही येथे येऊन रक्तदान करता येते. रक्तदानामुळे दुसऱ्या एखाद्याचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे स्वमर्जीने येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्येही सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत येऊन रक्तदान करता येते. मनात गैरसमज न ठेवता सर्वांनी रक्तदान करावे-डाॅ. अनंत हजारे, रक्तसंक्रमण अधिकारी, चंद्रपूर

लस घेण्यापूर्वी रक्तदान कराकोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम राबिवली जात आहे. त्यामुळे रक्तदानावरही याचा परिणाम होत आहे. नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून  रक्तदान करणे हाच पर्याय आहे.

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी