शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रकरण मिटविण्याच्या नादातच पेटला गोंडपिपरीतील ‘झेंडा वाद’

By admin | Updated: October 3, 2015 01:01 IST

येथील बहुचर्चित झेंडा वाद मिटविण्याच्या प्रयत्नातच अधिक पेटल्याची चर्चा आता शहरात होऊ लागली आहे. या एकूणच प्रकरणात आता अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.

दोन वर्षातील दुसरी घटना : अधिकारीच ठरले ‘टार्गेट’वेदांत मेहरकुळे गोंडपिपरीयेथील बहुचर्चित झेंडा वाद मिटविण्याच्या प्रयत्नातच अधिक पेटल्याची चर्चा आता शहरात होऊ लागली आहे. या एकूणच प्रकरणात आता अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.शहरातील बाजार मार्गावरील स्थित हनुमान मंदिरातील शिवलिंग हनुमान मूर्तीची तोडफोड करून अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. ही घटना सोमवारच्या सकाळी नागरिकांना लक्षात येताच संपूर्ण गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरून घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नागरिक एकत्र आले. याच दरम्यान, गावात बंदचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरिकांनी गावातील प्रमुख राज्यमार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. शहरात सर्वत्र तणावाची परिस्थिती असताना पोलिसांकडून प्रकरणाचा निपटारा करताना झालेली चूक ही जनतेच्या रोषाचे कारण होऊन ‘झेंडा’ या नव्या वादाला प्रारंभ झाला आणि गत काही वर्षापूर्वी इतिहासजमा असलेल्या मूर्ती विटंबना प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. कुठल्याही धर्मासंबधातील विटंबना हा निंदनिय प्रकार आहे. मात्र समाजातच वावरणाऱ्या काही समाजकंटकांकडून असा अनुचित प्रकार घडणे ही विकृतीच म्हणावी लागेल. तत्पूर्वी तालुक्यातील अशाच एका घटनेचा आढावा घेतल्यास गत काही वर्षांपूर्वी तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या तामसा (खु) गावाजवळील वैनगंगा तिरावर शिवमंदीर आहे. तेथील शिवलिंगाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. याची वार्ता तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पसरताच, त्या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी जमून वैनगंगा नदी तिरावरही आंदोलन पेटले. यावेळी गोंडपिपरीचे तत्कालिन तहसिलदार मदन खाडीलकर हे प्रकरणाचा निपटारा व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोहचले. दुभंगलेल्या मूर्तीची डागडुजी करून पुन्हा पूजा करावी, असा सल्ला देऊन ते तेथून निघाले आणि वादाला तोंड फुटले. नागरिकांच्या भावना अनावर होवून आंदोलन भडकले. या घटनेचे पडसाद म्हणून खाडीलकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.सोमवारी गोंडपिपरीत घडलेल्या निंदनिय घटनेत पोलिसांनी जर मागील घटनेचा आढावा घेतला असता तर निश्चितच ‘झेंडा वाद’ पेटला नसता. सोमवारी शहरातील नागरिक मूर्तीची विटंबना झाल्यानंतर निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यावर आले. नागरिकांचे आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू असताना पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या वाहनातून आलेल्या शिपायाने पुढे येऊन आंदोलकांच्या हातातील झेंडा हिसकावून तो मोडण्याचा प्रयत्न केला. तेथूनच नव्या वादाला तोंड फुटले. यावेळी पोलिसांनी जर संयम बाळगून नागरिकांची समजूत घातली असती तर वाद उफाळला नसता. मूर्ती विटंबनेसारखे निंदनिय प्रकरण घडवून आणणाऱ्यांना धडा शिकविणे ही काळाची गरज आहे.आजघडीला झेंडा वादामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात दरी निर्माण झाली आहे. झेंडा वादाचे मुळ ठरणाऱ्या पोलीस शिपायासोबतच ठाणेदार बोत्रे यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच प्रकरणाचे दुसरे दिवशी येथीलच एका हॉटेल व्यवसायिकाला आंदोलनातील प्रमुखांपैकी एक असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्याला दमदाटी करण्याचा प्रतापही पोलिसांकडून करण्यात आल्याचे त्या युवकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या सर्व प्रकरणात ठाणेदार बोत्रेसह शिपाई मनोज धकाते याची तडकाफडकी बदली झाल्याची शहरात चर्चा आहे.या मूर्ती विटंबनेच्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीचा शोध घ्यावा व त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.