शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

उमलत्या कळींमध्ये पसरतेय काळे विष !

By admin | Updated: December 1, 2014 22:50 IST

दिवसामागून दिवस उलटत आहे. पण कोंढा येथील कोळशाची धुळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिसरातील बालकांच्या शरीरात धुळीचे विष पसरत आहे. एका वर्षाखालील बालकांमध्ये दम्याचा आजार दिसून येत आहे.

सचिन सरपटवार/ गणेश ठमके - कोंढा (भद्रावती)दिवसामागून दिवस उलटत आहे. पण कोंढा येथील कोळशाची धुळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिसरातील बालकांच्या शरीरात धुळीचे विष पसरत आहे. एका वर्षाखालील बालकांमध्ये दम्याचा आजार दिसून येत आहे. धुळीच्या प्रदूषणामुळे बालकांमध्ये न्युमोनिया, सर्दी, खोकला व त्वचेचा आजार वाढत आहे. शुद्ध हवेत श्वासोश्वास घेण्याऐवजी चिमूकल्याच्या नाकात कोळशाची धूळ शिरत आहे. त्यामुळे भविष्यात विविध आजारांची शक्यता बळावली आहे. या उमलत्या कळ्यांची धुळीपासून वेळीच मुक्तता न केल्यास वेळेच्या आधी ‘त्या’ कळ्या कोमजल्या शिवाय राहणार नाही आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय कोंढावासीयांजवळ काहीच उरणार नाही. हे वास्तव आहे कोंढागावचे. ज्या गावात धुळीमुळे बालकांना जगणे कठीण झाले आहे. धुळीमुळे गावातील मत्ते यांच्या दोन महिने वय असलेल्या नातीच्या नाकात धुळीचे खडे जमा झाले होते. तीन वर्षाच्या तन्मय विरुटकर याला त्वचेचा आजार आहे. दोन वर्षाच्या आर्या गोंडेच्या शरीरावर खरुज झाली आहे. १० वर्षाच्या पुजा मंगाम हिला डोळ्याची समस्या निर्माण झाली आहे. १९ वर्षाच्या स्वप्नील ठावरीला धुळीमुळे काळजाशी संगलग्नीत आजार झाला आहे. सुहाना राजुरकर (अडीच वर्ष), आस्टु वरारकर (४), राणी डाखरे (४) धनश्री साखरकर (६), लिना माणूसमारे (९), विशाल मंगाम, रोहीम मंगाम, संजू देवतळे, राधिका माणूसमारे, कुणाल काळे, गणेश खेरे यांना धुळीमुळे सर्दी, पोटदुखी, गळ्यात खसखस, सतत खोकला या आजारांना सामोरे जावे लागले आहे.कर्नाटका एम्टा कंपनीकडून केल्या जाणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध कोंढावासीयांच्या मनात तिव्र भावना आहेत. कोंढा फाटा ते चालबर्डीपर्यंतच्या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरुन होत असलेल्या कोळसा वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम कोंढा येथील बालकांवर होत आहे.