शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

चिमूरकरांनी पाळला काळा दिन

By admin | Updated: January 7, 2017 00:43 IST

चिमुरातील नागरिकांनी ५ जानेवारी २००२ रोजी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चादरम्यान तहसील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती.

कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजेचिमूर : चिमुरातील नागरिकांनी ५ जानेवारी २००२ रोजी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चादरम्यान तहसील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामध्ये अनेकांना तुरूंगवास झाला. त्या तुरूंगवासाचा निषेध म्हणून चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ५ जानेवारी या दिवसाला ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ‘चिमूर जिल्हा झालाच पाहिजे’, यासाठी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बडे व स्वातंत्र संग्राम सैनिक दामोधर काळे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या चिमूर नगरीतील क्रांतिकारकांनी गेल्या ३७ वर्षांपासून चिमूरला क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी स्वातंत्र संग्राम सैनिकासह सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्याकडून अनेक आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळत नाही. चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासनाकडे रेटण्यासाठी चिमूरकरांनी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना केली आहे.सर्वपक्षीय चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ५ जानेवारी २००२ रोजी तहसील कार्यालयावर जिल्ह्याच्या मागणीकरिता मोर्चा काढला होता. या मोर्चातील जमावाने संतप्त होवून तहसील कार्यालयाची जाळपोळ केली होती. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे ५ जानेवारी या दिनाला कृती समितीकडून ‘काळा दिन’ म्हणून पाळण्यात येते. मात्र याच दिनाचे औचित्य साधून चिमूर जिल्हा कृती समितीतर्फे प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री व प्रशासनाला निवेदन देण्यात येते. गुरूवारी निवेदन देताना कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे (गुरुजी), सुनील मैद, तालुका काँग्रेस अध्यक्ष माधव बिरजे, रमेश कराळे, किशोर सिंगरे, कृष्णा तपासे, गजानन बुटले, लता अगडे, सुरेखा अयरगडे, राजेंद्र लोणारे, इकलाख कुरेशी, गजानन अगडे, मनीष नंदेश्वर, ओम खैरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)९४ वर्षांच्या तरुणाची जिल्ह्यासाठी तळमळ१६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्रसंग्राम सैनिक दामोधर काळे (गुरुजी) यांनी चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी प्रथम केली होती. ती मागणी आता चिमूर ताुलक्यातील लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंतची झाली असून त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात येतात. सर्व आंदोलनात हिरीहिरीने सहभागी होणारे काळे गुरुजी आजघडीला ९४ वर्षांत पोहचले आहेत. मात्र प्रत्येक आंदोलनात सक्रीय असलेल्या गुरुजींची जिल्ह्यासाठी असलेली तळमळ त्यांच्या उपस्थितीमधून चिमूरकरांच्या लक्षात येते. जिल्ह्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची खुणगाठ काळे गुरुजीनी बांधल्याचे उपस्थित बोलून दाखवितात.