शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चिमूरकरांनी पाळला काळा दिन

By admin | Updated: January 7, 2017 00:43 IST

चिमुरातील नागरिकांनी ५ जानेवारी २००२ रोजी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चादरम्यान तहसील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती.

कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजेचिमूर : चिमुरातील नागरिकांनी ५ जानेवारी २००२ रोजी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चादरम्यान तहसील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामध्ये अनेकांना तुरूंगवास झाला. त्या तुरूंगवासाचा निषेध म्हणून चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ५ जानेवारी या दिवसाला ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ‘चिमूर जिल्हा झालाच पाहिजे’, यासाठी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बडे व स्वातंत्र संग्राम सैनिक दामोधर काळे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या चिमूर नगरीतील क्रांतिकारकांनी गेल्या ३७ वर्षांपासून चिमूरला क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी स्वातंत्र संग्राम सैनिकासह सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्याकडून अनेक आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळत नाही. चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासनाकडे रेटण्यासाठी चिमूरकरांनी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना केली आहे.सर्वपक्षीय चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ५ जानेवारी २००२ रोजी तहसील कार्यालयावर जिल्ह्याच्या मागणीकरिता मोर्चा काढला होता. या मोर्चातील जमावाने संतप्त होवून तहसील कार्यालयाची जाळपोळ केली होती. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे ५ जानेवारी या दिनाला कृती समितीकडून ‘काळा दिन’ म्हणून पाळण्यात येते. मात्र याच दिनाचे औचित्य साधून चिमूर जिल्हा कृती समितीतर्फे प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री व प्रशासनाला निवेदन देण्यात येते. गुरूवारी निवेदन देताना कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे (गुरुजी), सुनील मैद, तालुका काँग्रेस अध्यक्ष माधव बिरजे, रमेश कराळे, किशोर सिंगरे, कृष्णा तपासे, गजानन बुटले, लता अगडे, सुरेखा अयरगडे, राजेंद्र लोणारे, इकलाख कुरेशी, गजानन अगडे, मनीष नंदेश्वर, ओम खैरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)९४ वर्षांच्या तरुणाची जिल्ह्यासाठी तळमळ१६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्रसंग्राम सैनिक दामोधर काळे (गुरुजी) यांनी चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी प्रथम केली होती. ती मागणी आता चिमूर ताुलक्यातील लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंतची झाली असून त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात येतात. सर्व आंदोलनात हिरीहिरीने सहभागी होणारे काळे गुरुजी आजघडीला ९४ वर्षांत पोहचले आहेत. मात्र प्रत्येक आंदोलनात सक्रीय असलेल्या गुरुजींची जिल्ह्यासाठी असलेली तळमळ त्यांच्या उपस्थितीमधून चिमूरकरांच्या लक्षात येते. जिल्ह्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची खुणगाठ काळे गुरुजीनी बांधल्याचे उपस्थित बोलून दाखवितात.