शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

कर्नाटक पॉवर कंपनीतील कामगारांच्या पाठीशी भाजपा

By admin | Updated: November 7, 2015 00:47 IST

बरांज येथील बंद असलेल्या कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमीटेडच्या खुल्या कोळसा खाणीला लागलेली आग विझविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने स्वत: करावयास पाहिजे होते.

पत्रपरिषद : भाजपा महामंत्र्यांचे आश्वासनभद्रावती : बरांज येथील बंद असलेल्या कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमीटेडच्या खुल्या कोळसा खाणीला लागलेली आग विझविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने स्वत: करावयास पाहिजे होते. परंतु तसे न करता ते काम कंपनीला करावयास सांगितल्याने तेथील दोन कामगारांनी टॉवरवर चढून विरूगिरी केली. आम्ही कामगारांच्या बाजुने असून त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन भाजपाचे तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिले.२८ सप्टेंबरला मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांचे उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांनी जोपर्यंत प्रकल्पग्रस्त आणि कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कंपनीला कोणतेही काम करण्याची परवानगी देऊ नये, असे आदेश चंद्रपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. परंतु ३ आक्टोबरला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, केपीसीएल कंपनीचे संचालक, कामगार आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक पार पडली. त्यात कंपनीच्या खाणीतील जळत असलेला कोळसा तेथीलच पाण्याने विझविण्याचे ठरले. ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने जळत असलेला कोळसा वाचविणे, पाण्याखाली असलेल्या कोळश्याची प्रत खराब होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी सुचविलेल्या उपायाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविला. परंतु राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असल्याने ते तसे आदेश देऊ शकतात, असे जिवतोडे म्हणाले. पाणी काढण्याचे व जळीत कोळसा विझविण्याचे काम त्यांनी कंपनीला न देत जिल्हा प्रशासनाचे मार्फतीने करावयास पाहिजे होते. कंपनी स्वत:च ते काम करीत असल्याने प्रकल्पग्रस्त व कामगारात रोष निर्माण झाला. त्याचे पर्यावसन १९ आॅक्टोबरला झालेल्या विरूगिरीने झाला. जिल्हाधिकारी हे कामगार आणि प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांनी केल्याचे नरेंद्र जिवतोडे यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्ताना पुनर्वसनासाठी त्यांच्या ठिकाणापासून आठ किलोमिटर अंतरावरील जागा देणे कायद्याने बंधनकारक आहे. बरांज येथील १०० एकर जागा अजुनपर्यंत कंपनीने घेतली नाही. ती जागा घेऊन त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे, कार्यरत सर्व कामगारांना कर्नाटक पॉवर कार्पोरेशनमध्ये स्थायी नोकरी द्यावी. कंपनी बंद असलेल्या तारखेपासून त्यांना वेतन देण्यात यावे. त्यांच्या निवासाची बंद केलेली वीज व पाणीपुरवठा सुरळीत सुरू करावा, या मागण्यांचा सुद्धा यावेळी नरेंद्र जिवतोडे यांनी उहापोह केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, प्रवीण सातपुते, संजय पारखी, अफजलभाई, प्रवीण ठेंगणे, मंगेश लोणारकर, चेक बरांजचे सरपंच रंजिता नदीनुरू, उपसरपंच विजय तेलरांधे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)