शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

भाजप सरकारची कर्जमाफी फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:27 IST

शेतमालाला हमीभाव देण्यास भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढत असून सर्व सामान्यांच्या विरोधाचे निर्णय सरकार घेत आहे. बड्या उद्योजकांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली, असा प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील यांची टीका : जनसंघर्ष यात्रेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शेतमालाला हमीभाव देण्यास भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढत असून सर्व सामान्यांच्या विरोधाचे निर्णय सरकार घेत आहे. बड्या उद्योजकांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली, असा प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केले.महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्यावतीने शेतमालाला हमीभाव व शेतमाल नाफेड अंतर्गत खरेदी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, प्रलंबित सिंचन प्रकल्प सुरू करणे, महागाई, बेरोजगारी, शेतीकरिता २४ तास वीज पुरवठा यासह विविध मागण्यांसाठी शासनाच्याविरोधात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा शनिवारी दुपारी क्रांतिभूमी चिमूर येथे दाखल झाली. दरम्यान प्रेरणा कन्व्हेंटच्या ग्राउंडवर जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करताना ते बोलत होते.सभेची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी काँगेसमध्ये प्रवेश घेतला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सतीश वारजूकर यांच्या गावाचा विकास या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्तविक जि.प.चे काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, संचालन प्रा. राम राऊत तर आभार माधव बिरजे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक काँगे्रस कार्यकत्यानी परिश्रम घेतले. संघर्ष यात्रेत व जाहीर सभेला मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.वरोऱ्यात ढोल-ताशात जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागतवरोरा : जनसंघर्ष यात्रा वरोºयात दाखल होताच ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे, भगतसिंग मालधुरे, मिलिंद भोयर, मनोहर स्वामी, संजय वाघमारे, विलास टिपले यांनी यात्रेचे स्वागत केले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सभा घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, मागील साडेचार वर्षांपासून केंद्रात स्थापन झालेल्या भाजप सरकारने एकाही आश्वासन पूर्ण केले नाही. जनतेची घोर निराशा झाली आहे. तेच काम महाराष्ट्र सरकारनेही केले. निवडणुकीत केंद्र व राज्याचे सरकार खाली खेचा, असे आवाहनही त्यांनी केले.सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ -विजय वडेट्टीवारविधिमंडळ उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या योजनांवर आसूड ओढले. सरकारच्या अनेक योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. उज्ज्वला गॅस योजना व पीकविमा म्हणजे सर्वसामान्यांची पिळवणूक आहे. नोटबंदी व शेतकरी विरोधी धोरणावर टीका करीत सत्ताबदलासाठी काँग्रेस कार्यकार्त्यांनी जोमाने पुढील निवडणूकांना समोरे जावून काँग्रेसचे आमदार व खासदार निवडून आणण्याचा संकल्प करा, असे आवाहनही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केलेजनसंघर्ष यात्रेत तुरी झळकल्या२६ डिसेंबरपासून तालुक्यातील कन्हाळगाव शिवारात तूर उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी शेतकºयांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची झलक जनसंघर्ष यात्रेत बघायला मिळाली. जाहीर सभेसाठी ग्राऊंडवर उभारलेल्या मंडपाच्या खांबांना तुरीच्या पेंड्या लटकविलेल्या होत्या.तीन तास उशीर, कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थितीजनसंघर्ष यात्रेची जाहीर सभा स्थानिक न्यू राष्ट्रीय प्रेरणा कॉन्व्हेंटच्या प्रांगणात आयोजित केली होती. चिमूर, नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सकाळपासूनच येत होते. सभा तब्बल तीन तास उशीराने झाली तरीही लक्षणीय उपस्थिती होती.कडेकोट बंदोबस्तजनसंघर्ष यात्रेच्या सभेकरिता चिमूरात काँगे्रस कार्यकर्त्यांसह नागरिकांची सकाळपासून गर्दी उसळली होती. शहरातील सर्व मार्ग नागरिकांच्या गर्दीने फुलले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात चिमूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद मदामे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा व दंगा नियंत्रण दलाचे कर्मचारी बंदोबस्तकरिता तैनात करण्यात आल होते.सतीश वारजुकर यांना विधानसभेसाठी हिरवी झेंडीयेणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभा क्षेत्रात डॉ. सतीश वारजुकर यांनी कामाला लागावे, असे सुतोवाच विधानसभा उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावर विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी पुष्टी दिली.३१ सरपंच व ४ उपसरपंच काँग्रेसमध्येजनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने चिमूर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून तालुक्यातील ३१ सरपंच व ४ उपसरपंच यांच्यासह चिमूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तुषार शिंदे, जयश्री निवटे यांनी विखे पाटील यांच्या उपस्थिती कांग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.