शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

काळा पैसा उघडकीस आणण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 00:37 IST

देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसची टीका : ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन चंद्रपूर : देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी ५० दिवसांमध्ये देशातील काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाल्यानंतरही सरकार आतापर्यंत काळा पैसा उघडकीस आणू शकलेले नाही. सरकारचा नोटबंदीच घेतलेला निर्णय चुकीचा सिद्ध झाला, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सोमवारी येथे केला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रकाश राठोड आणि विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश राठोड म्हणाले की, नोटबंदीमध्ये भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्याच वेळी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या ५० दिवसांमध्ये सामान्य लोकांचे बँकांमध्ये १४ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. नोटबंदीनंतरही काळा पैसा बाहेर येऊ शकलेला नाही. जनविरोधी निर्णय घेऊन मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण देशासह चंद्रपूर जिल्ह्यात ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले जाणार आहे.े महागाईविरोधात ९ जानेवारी रोजी चंद्रपूर येथे महिलांचे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहितीही राठोड यांनी दिली. यावेळी आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात नोटबंदीनंतर नोटांची टंचाई निर्माण झाली. ती लक्षात घेऊन मोदी सरकार कॅशलेस व्यवहार करण्याचा राग गात आहे. परंतु भाजप सरकारची ही योजनादेखील अपशयी ठरत आहेत. राज्यातील ४१ हजार गावांमध्ये बँक नाहीत आणि शेतकऱ्यांची बँकेत जमा ठेवही नाही. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच नसल्याने ते कॅशलेस व्यवहार कसे करू शकतात? शहरी भागातील अनेक एटीएममध्ये पैसे नाहीत. मोदी सरकारच्या ५० दिवसांच्या निर्णयानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, आसावरी देवतळे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, काँग्रेस महानगराध्यक्ष नंदू नागरकर व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणनकर यांच्यासह कांग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)