शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

काळा पैसा उघडकीस आणण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 00:37 IST

देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसची टीका : ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन चंद्रपूर : देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी ५० दिवसांमध्ये देशातील काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाल्यानंतरही सरकार आतापर्यंत काळा पैसा उघडकीस आणू शकलेले नाही. सरकारचा नोटबंदीच घेतलेला निर्णय चुकीचा सिद्ध झाला, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सोमवारी येथे केला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रकाश राठोड आणि विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश राठोड म्हणाले की, नोटबंदीमध्ये भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्याच वेळी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या ५० दिवसांमध्ये सामान्य लोकांचे बँकांमध्ये १४ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. नोटबंदीनंतरही काळा पैसा बाहेर येऊ शकलेला नाही. जनविरोधी निर्णय घेऊन मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण देशासह चंद्रपूर जिल्ह्यात ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले जाणार आहे.े महागाईविरोधात ९ जानेवारी रोजी चंद्रपूर येथे महिलांचे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहितीही राठोड यांनी दिली. यावेळी आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात नोटबंदीनंतर नोटांची टंचाई निर्माण झाली. ती लक्षात घेऊन मोदी सरकार कॅशलेस व्यवहार करण्याचा राग गात आहे. परंतु भाजप सरकारची ही योजनादेखील अपशयी ठरत आहेत. राज्यातील ४१ हजार गावांमध्ये बँक नाहीत आणि शेतकऱ्यांची बँकेत जमा ठेवही नाही. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच नसल्याने ते कॅशलेस व्यवहार कसे करू शकतात? शहरी भागातील अनेक एटीएममध्ये पैसे नाहीत. मोदी सरकारच्या ५० दिवसांच्या निर्णयानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, आसावरी देवतळे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, काँग्रेस महानगराध्यक्ष नंदू नागरकर व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणनकर यांच्यासह कांग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)