शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपाच्या गोटात

By admin | Updated: May 22, 2014 01:01 IST

लोकसभा निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी यंदा काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींना चांगलाच धडा शिकविला आहे.

राजुरा : लोकसभा निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी यंदा काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींना चांगलाच धडा शिकविला आहे. काँग्रेस मंडळी अतिविश्‍वासात रममाण झाली होती. मात्र दुसरीकडे मतदार त्यांच्याप्रति नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपाला आघाडी मिळवून दिली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपाच्या गोटात गेला.

लोकसभा निवडणुकीत नेहमीच काँग्रेस पक्षास आघाडी मिळत होती. माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या नेतृत्वात पक्ष संघटित होता. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहत होते. संघटित होऊन निवडणुकीत भाग घेत होते. त्यांच्या शब्दास मानत होते. त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्‍वास होता. त्याच विश्‍वासाने कार्यकर्त्याचे कामे केली जात होती. मतदारावर त्याची पकड होती. ते घराच्या चौकटीतून बाहेर निघून कार्य करीत होते. कार्यकर्त्यासाठी सार्थक ठरत होते. त्यामुळे कार्यकर्ते व मतदार त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहत होते. परंतु सध्या ते वयोवृद्ध झाले आहेत. अपघाताने कमजोर झाले. त्यामुळे त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. तसेच न.प. उपाध्यक्ष अरुण धोटे राजकारणात सक्रिय झाले. धोटे बंधुवर काँग्रेस पक्षाची जबाबदारी आली. त्याची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. त्यांनी या निवडणुकीत सक्रीय भाग घेऊन काँग्रेस पक्षाची मताची आघाडी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मामुलकर प्रकृती अस्वस्थमुळे जास्त फिरु शकले नाही. त्याचा परिणाम मतदारावर झाला.

भाजपाचे उमेदवार खा. हंसराज अहीर या विधानसभा क्षेत्रात लक्ष ठेवून शेतकर्‍यांच्या हितासाठी लढत होते. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. प्रत्येक गावास भेट दिली. वेकोलिद्वारा घेण्यात येणार्‍या जमिनीच्या (अधिग्रहण) दरात मोठी वाढ केली. दोन एकर जमीनधारकास नोकरी देण्याचे नियम तयार करावयास लावले. यापूर्वी वेकोलिकडून प्रतिएकर २५ हजार मिळत होते. ते आता आठ ते दहा लाख केले. त्यामुळे जनतेत त्याच्या कार्याप्रति आस्था निर्माण झाली. आम जनतेसोबत शासकीय कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा करुन समस्या सोडवत होते. त्याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत पाहावयास मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीत नेहमीच भाजपास तिसरे स्थान राहत होते. या विधानसभा क्षेत्रात भाजपाचे मतदार र्मयादित होते. त्यावर ते समाधान मानत होते. ती र्मयादा मोडून काढण्यासाठी खा.हंसराज अहीर यांनी कार्यर्त्याना संघटित केले. दर १५ दिवसाने राजुरा येथील भाजपा कार्यालयात येऊन जनतेच्या समस्यावर चर्चा करून त्या सोडविल्या जात होत्या. त्याचा परिणाम जनतेवर झाला. भाजपाचे र्मयादीत कार्यकर्ते असतानासुद्धा मोठी आघाडी घेऊन शेतकरी संघटना व काँग्रेस पक्षास मागे टाकले. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी घराच्या चौकटीत बसून कार्य करीत होते. त्यांना जनता आपल्या पाठीशी आहे अशी भावना होती. आघाडी कायम ठेवून यावर त्याचा विश्‍वास होता. परंतु मतदारांनी त्याच्या अतिविश्‍वासास तडा देवून चौकटीच्या बाहेर निघा, असा मतदानातून जणू इशाराच दिला आहे.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह नव्हता. गटबाजीने पक्ष पोखरला आहे. त्यामुळे मतदारापर्यंत कार्यकर्ते पोहचले नाही. जनतेत काँग्रेस व शेतकरी संघटनेबाबत नाराजी होती. त्यामुळेच भाजपाने गड काबीज केला. (तालुका प्रतिनिधी)