शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपाच्या गोटात

By admin | Updated: May 22, 2014 01:01 IST

लोकसभा निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी यंदा काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींना चांगलाच धडा शिकविला आहे.

राजुरा : लोकसभा निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी यंदा काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींना चांगलाच धडा शिकविला आहे. काँग्रेस मंडळी अतिविश्‍वासात रममाण झाली होती. मात्र दुसरीकडे मतदार त्यांच्याप्रति नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपाला आघाडी मिळवून दिली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपाच्या गोटात गेला.

लोकसभा निवडणुकीत नेहमीच काँग्रेस पक्षास आघाडी मिळत होती. माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या नेतृत्वात पक्ष संघटित होता. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहत होते. संघटित होऊन निवडणुकीत भाग घेत होते. त्यांच्या शब्दास मानत होते. त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्‍वास होता. त्याच विश्‍वासाने कार्यकर्त्याचे कामे केली जात होती. मतदारावर त्याची पकड होती. ते घराच्या चौकटीतून बाहेर निघून कार्य करीत होते. कार्यकर्त्यासाठी सार्थक ठरत होते. त्यामुळे कार्यकर्ते व मतदार त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहत होते. परंतु सध्या ते वयोवृद्ध झाले आहेत. अपघाताने कमजोर झाले. त्यामुळे त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. तसेच न.प. उपाध्यक्ष अरुण धोटे राजकारणात सक्रिय झाले. धोटे बंधुवर काँग्रेस पक्षाची जबाबदारी आली. त्याची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. त्यांनी या निवडणुकीत सक्रीय भाग घेऊन काँग्रेस पक्षाची मताची आघाडी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मामुलकर प्रकृती अस्वस्थमुळे जास्त फिरु शकले नाही. त्याचा परिणाम मतदारावर झाला.

भाजपाचे उमेदवार खा. हंसराज अहीर या विधानसभा क्षेत्रात लक्ष ठेवून शेतकर्‍यांच्या हितासाठी लढत होते. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. प्रत्येक गावास भेट दिली. वेकोलिद्वारा घेण्यात येणार्‍या जमिनीच्या (अधिग्रहण) दरात मोठी वाढ केली. दोन एकर जमीनधारकास नोकरी देण्याचे नियम तयार करावयास लावले. यापूर्वी वेकोलिकडून प्रतिएकर २५ हजार मिळत होते. ते आता आठ ते दहा लाख केले. त्यामुळे जनतेत त्याच्या कार्याप्रति आस्था निर्माण झाली. आम जनतेसोबत शासकीय कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा करुन समस्या सोडवत होते. त्याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत पाहावयास मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीत नेहमीच भाजपास तिसरे स्थान राहत होते. या विधानसभा क्षेत्रात भाजपाचे मतदार र्मयादित होते. त्यावर ते समाधान मानत होते. ती र्मयादा मोडून काढण्यासाठी खा.हंसराज अहीर यांनी कार्यर्त्याना संघटित केले. दर १५ दिवसाने राजुरा येथील भाजपा कार्यालयात येऊन जनतेच्या समस्यावर चर्चा करून त्या सोडविल्या जात होत्या. त्याचा परिणाम जनतेवर झाला. भाजपाचे र्मयादीत कार्यकर्ते असतानासुद्धा मोठी आघाडी घेऊन शेतकरी संघटना व काँग्रेस पक्षास मागे टाकले. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी घराच्या चौकटीत बसून कार्य करीत होते. त्यांना जनता आपल्या पाठीशी आहे अशी भावना होती. आघाडी कायम ठेवून यावर त्याचा विश्‍वास होता. परंतु मतदारांनी त्याच्या अतिविश्‍वासास तडा देवून चौकटीच्या बाहेर निघा, असा मतदानातून जणू इशाराच दिला आहे.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह नव्हता. गटबाजीने पक्ष पोखरला आहे. त्यामुळे मतदारापर्यंत कार्यकर्ते पोहचले नाही. जनतेत काँग्रेस व शेतकरी संघटनेबाबत नाराजी होती. त्यामुळेच भाजपाने गड काबीज केला. (तालुका प्रतिनिधी)