शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

By admin | Updated: January 1, 2017 01:14 IST

अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले.

जि.प. व पं.स. निवडणूक : मोर्चेबांधणीला वेग उदय गडकरी सावली अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले. सिंदेवाही नगर पंचायतीनेही भाजपच्याच बाजूने कौल दिला. या संपूर्ण निकालावरुन भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला असल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांमध्ये उदासिनता निर्माण झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे एकमेव आमदार विजय वडेट्टीवार आहेत. मात्र त्यांचा बालेकिल्ला असतानाही सिंदेवाही नगर पंचायतीवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व स्थापन करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अस्तित्व नसलेल्या आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना विचार करण्यास भाग पाडले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास भाजपाकडे दोन खासदार, पाच आमदार, दोन मंत्री एक केंद्रीय मंत्री आणि एक राज्याचे अर्थमंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री, शिवाय महाराष्ट्रात सत्ता एवढी सारी भाजपाकडे जमेची बाजू असताना त्यांची सर्वच स्तरात सत्ता प्रस्थापित होणे क्रमप्राप्तच आहे. हे नाकारण्याजोगे नाही. मात्र या सर्व रणधुमाळीत आ. वडेट्टीवारांची खरी परीक्षा आहे. नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निकालाने उत्साहित भाजपाचा व्यास चौफेर उधळण करीत असताना वडेट्टीवारांना आपल्या क्षेत्रात अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सावली तालुक्यात चार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आठ सदस्य क्षेत्र आहेत. विद्यमान स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जि.प. क्षेत्र तर भाजपा व काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक क्षेत्र आले आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादीनेच झेंडा रोवला होता. असे असतानाही राष्ट्रवादीचे या क्षेत्रातील प्रमुख नेते आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्यासमोरही या निवडणुकीचे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून या क्षेत्रात प्राबल्य नसले तरी संदीप गड्डमवारांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय आ. विजय वडेट्टीवारांचे हे क्षेत्र असल्याने त्यांच्या बाजुने जनमत मोठ्या प्रमाणात आहे. या तुलनेत मात्र भाजपाकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या व्यतिरिक्त कोणताही मोठा नेता नसतानासुद्धा केंद्र आणि राज्यातील सत्तेने भाजपा कार्यकर्ते उत्साहात आहेत. प्रधानमंत्री मोदींनी केलेल्या नोटबंदीमुळे निवडणुकांवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट फायदाच झाल्याचे भाजपाच्या उत्साहावरुन दिसून येत आहे. मात्र येणारी जि.प. व पं.स. निवडणूक ही सर्वच पक्षांकरिता रंगीत तालीम ठरणारी आहे. राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. चार पैकी काही जिल्हा परिषद क्षेत्रात नेमका कोणता उमेदवार द्यावा या संभ्रमात सर्वच पक्ष आहेत तर दुसरीकडे आंबेडकरी विचारधारेच्या संपूर्ण पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्धार केल्याने प्रमुख राजकीय पक्षांची धकधक वाढली आहे.