शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

By admin | Updated: January 1, 2017 01:14 IST

अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले.

जि.प. व पं.स. निवडणूक : मोर्चेबांधणीला वेग उदय गडकरी सावली अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले. सिंदेवाही नगर पंचायतीनेही भाजपच्याच बाजूने कौल दिला. या संपूर्ण निकालावरुन भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला असल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांमध्ये उदासिनता निर्माण झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे एकमेव आमदार विजय वडेट्टीवार आहेत. मात्र त्यांचा बालेकिल्ला असतानाही सिंदेवाही नगर पंचायतीवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व स्थापन करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अस्तित्व नसलेल्या आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना विचार करण्यास भाग पाडले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास भाजपाकडे दोन खासदार, पाच आमदार, दोन मंत्री एक केंद्रीय मंत्री आणि एक राज्याचे अर्थमंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री, शिवाय महाराष्ट्रात सत्ता एवढी सारी भाजपाकडे जमेची बाजू असताना त्यांची सर्वच स्तरात सत्ता प्रस्थापित होणे क्रमप्राप्तच आहे. हे नाकारण्याजोगे नाही. मात्र या सर्व रणधुमाळीत आ. वडेट्टीवारांची खरी परीक्षा आहे. नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निकालाने उत्साहित भाजपाचा व्यास चौफेर उधळण करीत असताना वडेट्टीवारांना आपल्या क्षेत्रात अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सावली तालुक्यात चार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आठ सदस्य क्षेत्र आहेत. विद्यमान स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जि.प. क्षेत्र तर भाजपा व काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक क्षेत्र आले आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादीनेच झेंडा रोवला होता. असे असतानाही राष्ट्रवादीचे या क्षेत्रातील प्रमुख नेते आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्यासमोरही या निवडणुकीचे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून या क्षेत्रात प्राबल्य नसले तरी संदीप गड्डमवारांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय आ. विजय वडेट्टीवारांचे हे क्षेत्र असल्याने त्यांच्या बाजुने जनमत मोठ्या प्रमाणात आहे. या तुलनेत मात्र भाजपाकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या व्यतिरिक्त कोणताही मोठा नेता नसतानासुद्धा केंद्र आणि राज्यातील सत्तेने भाजपा कार्यकर्ते उत्साहात आहेत. प्रधानमंत्री मोदींनी केलेल्या नोटबंदीमुळे निवडणुकांवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट फायदाच झाल्याचे भाजपाच्या उत्साहावरुन दिसून येत आहे. मात्र येणारी जि.प. व पं.स. निवडणूक ही सर्वच पक्षांकरिता रंगीत तालीम ठरणारी आहे. राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. चार पैकी काही जिल्हा परिषद क्षेत्रात नेमका कोणता उमेदवार द्यावा या संभ्रमात सर्वच पक्ष आहेत तर दुसरीकडे आंबेडकरी विचारधारेच्या संपूर्ण पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्धार केल्याने प्रमुख राजकीय पक्षांची धकधक वाढली आहे.