शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्ण्यात मोठा दुग्ध विकास प्रकल्प उभारणार

By admin | Updated: October 7, 2014 23:32 IST

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले.

सुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा तालुक्यात विविध गावांमध्ये भेटींच्या माध्यमातून जनसंवादचंद्रपूर : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत मोदींनी भारतवासीयांची मने जिंकली. गेल्या १५ वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राला अधोगतीकडे नेले आहे. केवळ भ्रष्टाराचात आघाडीवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राची अक्षरश: लूट केली आहे. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली. याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. राज्यात भाजपा व मित्रपक्षांचे सरकार सत्तारुढ झाल्यास पोंभूर्णा एमआयडीसीचा निर्णय तातडीने घेण्यात येईल तसेच पोंभूर्णा तालुक्यासाठी दुग्धविकास प्रकल्प उभारण्यात येईल, असे प्रतिपादन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रााचे भाजपा- रिपाई (आ.)- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा तालुक्यातील नवेगार मोरे येथील जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. पोंभूर्णा तालुक्यात आपण मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली आहे. तालुक्यात फिरते वाचनालय उपलब्ध केले आहे. उपकोषागार कार्यालयाची निर्मिती केली. ग्रामीण रुग्णालय मंजूर करविले आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ५२ लक्ष रुपये निधी विकासकामांसाठी मंजूर केला आहे. माळी समाजासाठी सभागृह, श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय अशी विविध विकास कामे आम्ही पूर्णत्वास आणली आहे. नेत्र चिकित्सा शिबिर, अपंगांना तीनचाकी सायकलींचे वितरण, सामूहिक विवाह मेळावे अशा विविध सामाजिक उपक्रमांची मालिका आम्ही या तालुक्यात राबविली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून राज्यात भाजपाचे सरकार आल्यास या तालुक्याच्या विकासाची गाडी अधिक वेगाने धावेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.यावेळी प्रमोद कडू म्हणाले, राज्यात यंदा सत्ता परिवर्तन अटळ आहे. जनता भाजपाला पूर्ण बहुमत देणार असा विश्वास आहे. यावेळी मंचावर भाजप नेते प्रमोद कडू, भाजपाचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष गजानन गोरगंटीवार, जि.प. सदस्य अल्का आत्राम, पं.स. सभापती बापू चिंचोळकर, पं.स. सदस्य महेश रणदिवे, भारती कन्नाके, बाजार समितीचे सभापती राहुल संतोषवार, उपसभापती हरिश ढवस आदी भााजपा पदाधिकारी उपस्थित होते.