शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

पोंभुर्ण्यात मोठा दुग्ध विकास प्रकल्प उभारणार

By admin | Updated: October 7, 2014 23:32 IST

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले.

सुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा तालुक्यात विविध गावांमध्ये भेटींच्या माध्यमातून जनसंवादचंद्रपूर : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत मोदींनी भारतवासीयांची मने जिंकली. गेल्या १५ वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राला अधोगतीकडे नेले आहे. केवळ भ्रष्टाराचात आघाडीवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राची अक्षरश: लूट केली आहे. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली. याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. राज्यात भाजपा व मित्रपक्षांचे सरकार सत्तारुढ झाल्यास पोंभूर्णा एमआयडीसीचा निर्णय तातडीने घेण्यात येईल तसेच पोंभूर्णा तालुक्यासाठी दुग्धविकास प्रकल्प उभारण्यात येईल, असे प्रतिपादन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रााचे भाजपा- रिपाई (आ.)- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा तालुक्यातील नवेगार मोरे येथील जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. पोंभूर्णा तालुक्यात आपण मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली आहे. तालुक्यात फिरते वाचनालय उपलब्ध केले आहे. उपकोषागार कार्यालयाची निर्मिती केली. ग्रामीण रुग्णालय मंजूर करविले आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ५२ लक्ष रुपये निधी विकासकामांसाठी मंजूर केला आहे. माळी समाजासाठी सभागृह, श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय अशी विविध विकास कामे आम्ही पूर्णत्वास आणली आहे. नेत्र चिकित्सा शिबिर, अपंगांना तीनचाकी सायकलींचे वितरण, सामूहिक विवाह मेळावे अशा विविध सामाजिक उपक्रमांची मालिका आम्ही या तालुक्यात राबविली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून राज्यात भाजपाचे सरकार आल्यास या तालुक्याच्या विकासाची गाडी अधिक वेगाने धावेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.यावेळी प्रमोद कडू म्हणाले, राज्यात यंदा सत्ता परिवर्तन अटळ आहे. जनता भाजपाला पूर्ण बहुमत देणार असा विश्वास आहे. यावेळी मंचावर भाजप नेते प्रमोद कडू, भाजपाचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष गजानन गोरगंटीवार, जि.प. सदस्य अल्का आत्राम, पं.स. सभापती बापू चिंचोळकर, पं.स. सदस्य महेश रणदिवे, भारती कन्नाके, बाजार समितीचे सभापती राहुल संतोषवार, उपसभापती हरिश ढवस आदी भााजपा पदाधिकारी उपस्थित होते.