शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

चैत्यभूमीवर भीमसागर

By admin | Updated: December 6, 2015 00:53 IST

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई, दादर येथे समुद्र किनाऱ्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई, दादर येथे समुद्र किनाऱ्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले. बौद्ध संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला आहे. परिसराला चैत्यभूमि असे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्या दिल्ली निवासस्थानी झाले. दिल्लीहून त्यांचे पार्थिव रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रूज विमानतळावर आणण्यात आले. विमानातून डॉ. बाबासाहेबांचे पुष्पाच्छादित पार्थिव बाहेर येताच विमानतळावर असलेल्या पंचेवीस हजारांवर स्त्री- पुरुषांना रडू कोसळले. त्यानंतर नगरपालिकेच्या अ‍ॅम्बुलंन्समध्ये शव ठेवण्यात आले व मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून अ‍ॅम्ब्युलंसमध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती. सांताक्रूज ते दादर हे पाच मैलाचे अंतर पार करण्यास ३ तास लागले. पाच वाजून पाच मिनिटांनी अ‍ॅम्बुलंस राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लक्ष लोक अ‍ॅम्बुलंसची वाट पाहात बसून होते. ‘बुद्धं सरणं गच्छामि’ ची प्रार्थना तेथे सतत सुरू होती. अ‍ॅम्बुलंस राजगृहापाशी येताच, लोकांची एवढी गर्दी झाली की, पाच मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांना ते आवरणे अशक्य झाले. बरोबर सव्वापाच वाजता मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व उद्बत्त्यांच्या सुगंधमय वातावरणात डॉ. बाबासाहेबांचे शव अ‍ॅम्बुलंसमधून उतरविण्यात आले. त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धायमोकलून रडत होते. अर्ध्यातासानंतर डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची जनतेस मुभा देण्यात आली. डॉ. बाबासाहेबांनी महानिर्वाण यात्रा ७ डिसेंबर १९५६ ला राजगृहापासून दुपारी दोन वाजता निघाली. १० ते १२ लाख स्त्री- पुरुष या प्रेतयात्रेमध्ये सामील झाले होते. ही तीन मैलाची महायात्रा होती. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिवावर बौद्ध पद्धतीने अग्निसंस्कार करण्यात आले. आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने भीमानुयायी दाखल होतात. व चैत्यभूमीवर भीमसागर उसळतो आणि महामानवाला अभिवादन करतो.