शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चैत्यभूमीवर भीमसागर

By admin | Updated: December 6, 2015 00:53 IST

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई, दादर येथे समुद्र किनाऱ्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई, दादर येथे समुद्र किनाऱ्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले. बौद्ध संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला आहे. परिसराला चैत्यभूमि असे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्या दिल्ली निवासस्थानी झाले. दिल्लीहून त्यांचे पार्थिव रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रूज विमानतळावर आणण्यात आले. विमानातून डॉ. बाबासाहेबांचे पुष्पाच्छादित पार्थिव बाहेर येताच विमानतळावर असलेल्या पंचेवीस हजारांवर स्त्री- पुरुषांना रडू कोसळले. त्यानंतर नगरपालिकेच्या अ‍ॅम्बुलंन्समध्ये शव ठेवण्यात आले व मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून अ‍ॅम्ब्युलंसमध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती. सांताक्रूज ते दादर हे पाच मैलाचे अंतर पार करण्यास ३ तास लागले. पाच वाजून पाच मिनिटांनी अ‍ॅम्बुलंस राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लक्ष लोक अ‍ॅम्बुलंसची वाट पाहात बसून होते. ‘बुद्धं सरणं गच्छामि’ ची प्रार्थना तेथे सतत सुरू होती. अ‍ॅम्बुलंस राजगृहापाशी येताच, लोकांची एवढी गर्दी झाली की, पाच मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांना ते आवरणे अशक्य झाले. बरोबर सव्वापाच वाजता मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व उद्बत्त्यांच्या सुगंधमय वातावरणात डॉ. बाबासाहेबांचे शव अ‍ॅम्बुलंसमधून उतरविण्यात आले. त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धायमोकलून रडत होते. अर्ध्यातासानंतर डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची जनतेस मुभा देण्यात आली. डॉ. बाबासाहेबांनी महानिर्वाण यात्रा ७ डिसेंबर १९५६ ला राजगृहापासून दुपारी दोन वाजता निघाली. १० ते १२ लाख स्त्री- पुरुष या प्रेतयात्रेमध्ये सामील झाले होते. ही तीन मैलाची महायात्रा होती. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिवावर बौद्ध पद्धतीने अग्निसंस्कार करण्यात आले. आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने भीमानुयायी दाखल होतात. व चैत्यभूमीवर भीमसागर उसळतो आणि महामानवाला अभिवादन करतो.