शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

चैत्यभूमीवर भीमसागर

By admin | Updated: December 6, 2015 00:53 IST

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई, दादर येथे समुद्र किनाऱ्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई, दादर येथे समुद्र किनाऱ्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले. बौद्ध संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला आहे. परिसराला चैत्यभूमि असे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्या दिल्ली निवासस्थानी झाले. दिल्लीहून त्यांचे पार्थिव रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रूज विमानतळावर आणण्यात आले. विमानातून डॉ. बाबासाहेबांचे पुष्पाच्छादित पार्थिव बाहेर येताच विमानतळावर असलेल्या पंचेवीस हजारांवर स्त्री- पुरुषांना रडू कोसळले. त्यानंतर नगरपालिकेच्या अ‍ॅम्बुलंन्समध्ये शव ठेवण्यात आले व मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून अ‍ॅम्ब्युलंसमध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती. सांताक्रूज ते दादर हे पाच मैलाचे अंतर पार करण्यास ३ तास लागले. पाच वाजून पाच मिनिटांनी अ‍ॅम्बुलंस राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लक्ष लोक अ‍ॅम्बुलंसची वाट पाहात बसून होते. ‘बुद्धं सरणं गच्छामि’ ची प्रार्थना तेथे सतत सुरू होती. अ‍ॅम्बुलंस राजगृहापाशी येताच, लोकांची एवढी गर्दी झाली की, पाच मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांना ते आवरणे अशक्य झाले. बरोबर सव्वापाच वाजता मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व उद्बत्त्यांच्या सुगंधमय वातावरणात डॉ. बाबासाहेबांचे शव अ‍ॅम्बुलंसमधून उतरविण्यात आले. त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धायमोकलून रडत होते. अर्ध्यातासानंतर डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची जनतेस मुभा देण्यात आली. डॉ. बाबासाहेबांनी महानिर्वाण यात्रा ७ डिसेंबर १९५६ ला राजगृहापासून दुपारी दोन वाजता निघाली. १० ते १२ लाख स्त्री- पुरुष या प्रेतयात्रेमध्ये सामील झाले होते. ही तीन मैलाची महायात्रा होती. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिवावर बौद्ध पद्धतीने अग्निसंस्कार करण्यात आले. आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने भीमानुयायी दाखल होतात. व चैत्यभूमीवर भीमसागर उसळतो आणि महामानवाला अभिवादन करतो.