शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन

By admin | Updated: November 15, 2016 00:57 IST

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत.

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : समस्या सोडवाब्रह्मपुरी : जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक व मानसिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहे. परिणामी शेतकरी मानसिक विवंचनेत आत्महत्या करत आहे. त्यामुळे धानाला योग्य भाव देण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत, शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शिवाजी चौक ब्रह्मपुरी येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धरणे परिसातील शेतकऱ्यासह भारतीय किसान सभेच्या सदस्याने आंदोलन केले.यामध्ये प्रामुख्याने धानाला उत्पादन खर्चानूसार किमान प्रतीक्विंटल ३५०० रुपये भाव मिळावा, बारमाही सिंचन व्यवस्था, नियमित व अल्पदरात वीज पुरवठा, शेतातील सागवन व इतर झाडे कापण्याची विनाअट त्वरित परवानगी देण्यात यावी, पांदन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे, शेतमालाची बाजार समित्यामध्येच खरेदी विक्री तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोजमाप व विक्री करण्यात यावी, शेतीचे फेरफार व इतर कामे विनामूल्य व अल्पावधीत करण्याची तरतूद करण्यात यावी, ६० वर्ष वयातील शेतकऱ्यांना किमान तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशा विविध मागण्याचे निवेदन ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सदर मागण्यावर गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची विनंती केली. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष दादा पारधी, मनोहर बोरकर, वामनराव भुसारी, माधवराव पारधी, केशवराव सुर्यवंशी, विनायकराव कुर्वे, श्रीराम समर्थ, शिवाजी सोनवाने, माधव ठाकरे, शालीकराम चौके, विठोबा लांजेवार, महिला प्रमुख सविता पारधी, सुमन भोयर, शारदा माकडे, चंद्रभागा पारधी, गीता सुकारे, प्रमीला भागडकर, सावरकर तसेच भारतीय किसान संघाचे सर्व सदस्य तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)