शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन

By admin | Updated: November 15, 2016 00:57 IST

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत.

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : समस्या सोडवाब्रह्मपुरी : जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक व मानसिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहे. परिणामी शेतकरी मानसिक विवंचनेत आत्महत्या करत आहे. त्यामुळे धानाला योग्य भाव देण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत, शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शिवाजी चौक ब्रह्मपुरी येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धरणे परिसातील शेतकऱ्यासह भारतीय किसान सभेच्या सदस्याने आंदोलन केले.यामध्ये प्रामुख्याने धानाला उत्पादन खर्चानूसार किमान प्रतीक्विंटल ३५०० रुपये भाव मिळावा, बारमाही सिंचन व्यवस्था, नियमित व अल्पदरात वीज पुरवठा, शेतातील सागवन व इतर झाडे कापण्याची विनाअट त्वरित परवानगी देण्यात यावी, पांदन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे, शेतमालाची बाजार समित्यामध्येच खरेदी विक्री तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोजमाप व विक्री करण्यात यावी, शेतीचे फेरफार व इतर कामे विनामूल्य व अल्पावधीत करण्याची तरतूद करण्यात यावी, ६० वर्ष वयातील शेतकऱ्यांना किमान तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशा विविध मागण्याचे निवेदन ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सदर मागण्यावर गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची विनंती केली. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष दादा पारधी, मनोहर बोरकर, वामनराव भुसारी, माधवराव पारधी, केशवराव सुर्यवंशी, विनायकराव कुर्वे, श्रीराम समर्थ, शिवाजी सोनवाने, माधव ठाकरे, शालीकराम चौके, विठोबा लांजेवार, महिला प्रमुख सविता पारधी, सुमन भोयर, शारदा माकडे, चंद्रभागा पारधी, गीता सुकारे, प्रमीला भागडकर, सावरकर तसेच भारतीय किसान संघाचे सर्व सदस्य तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)