शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

भद्रावतीच्या ‘रितेश’ने घेतली चित्रपटसृष्टीत भरारी

By admin | Updated: March 9, 2015 01:31 IST

जिल्ह्यात कोळशासोबत कलावंतांचीही खाण आहे, असे म्हणतात. याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे.

चित्रीकरण विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित चित्रपटसचिन सरपटवार ल्ल भद्रावतीचंद्रपूर जिल्ह्यात कोळशासोबत कलावंतांचीही खाण आहे, असे म्हणतात. याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित ‘आत्मदाह’ या चित्रपटात नायक असलेल्या ‘कृष्णा’ची भूमिका भद्रावतीच्या रितेश भाऊराव नगराळे रा. पाटीलनगर या युवकाने साकारली आहे. ग्रामीण भागातल्या युवकाने चित्रपटसृष्टीत घेतलेली ही भरारी इतर कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.या चित्रपटाचे कथानकही बोध घेण्यासारखे आहे. मुलाने खुप शिकून मोठा अधिकारी व्हावे, ही शेतकरी असलेल्या वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मुलाला ते पुण्याला पाठवितात. स्पर्धा परीक्षेची तारीख जवळ आली असते. अचानक वडिलांच्या आत्महत्येची बातमी मुलाला कळते. मुलगा खेडेगावात परत येतो. त्यानंतर मात्र पुण्याला न जाण्याचा निर्णय घेतो. आई व बहिणीचा सांभाळ हेच तो आपले कर्तव्य समजतो. शांत न बसता वडिलांच्या आत्महत्येच्या कारणांचा तो शोध घेतो. यामागे कारणीभूत असलेला सावकार त्याला सापडतो. सावकाराने हडपलेली जमीनही त्याला परत मिळते. सावकाराच्याच मुलीवर त्याचे प्रेमही जडते. हे जरी चित्रपटाचे कथानक असले तरी या चित्रपटातील ‘कोमाच्या सिन’ व वडिलांना आत्महत्येचा झालेला पश्चात्ताप हे दृश्य मनाला चटका लावून जात असल्याचे स्वत: या शेतकऱ्याचा मुलगा असलेला कृष्णा म्हणजेच रितेशने सांगितले.रितेशचे शिक्षण दहावीपर्यंत येथील सेक्युलर विद्यालयात झाले. नंतर औरंगाबाद व पुणे येथे त्याने शिक्षण घेतले. पुणे येथे मास्टर आॅफ परफॉर्मिंग आर्टसचा त्याने अभ्यास केला. एकांकिका तसेच व्यावसायिक नाटकही केले. कोरिओग्राफर अर्जुन जाधव यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. याच काळात त्याला ‘आत्मदाह’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अन् ग्रामीण भागातल्या रितेशने या संधीचे सोने केले. यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव (आर्णीजवळ), दाभळी, लोणबेल या ठिकाणी या चित्रपटाचे जास्तीत जास्त चित्रीकरण झाल्याचे रितेशने सांगितले. शेतकऱ्याच्या कुटुंबात शेतकरी यशवंत जामकर, बायको रत्ना कोल्हापूरकर, शेतकऱ्याचा मुलगा कृष्णा (रितेश), सुप्रिया पाटील यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश बाठोरे तर निर्माते सुनील जयस्वाल हे आहेत. सावकाराने केलेल्या फसवणुकीमुळे शेतकरी वडील आत्महत्या करतात. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या दृश्यापासूनच चित्रपटाची सुरुवात होते. नवऱ्याच्या आत्महत्येमुळे कृष्णाची आई कोमात जाते व तब्येत बरी झाल्यानंतर ती वडिलांनी आत्महत्या का केली, या प्रकरणाची कृष्णाला माहिती देते.या चित्रपटात ‘क्रोमाचा सिन’ एक वेगळेपणा दर्शवतो. जेव्हा शेतकऱ्याला जाळले जात असते तेव्हा तो शेतकरी जिवंत असल्याचा भास निर्माण करण्यात येतो. त्या ठिकाणी शेतकरी असतो, परंतु तो कोणालाही दिसत नाही. तो इंद्रदेवाचे आभार मानतो. शेवटी आपण आत्महत्या केली, याबाबत शेतकऱ्याला पश्चात्ताप झाल्याचे दाखविले आहे.शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हा संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे रितेशने सांगितले. तसेच शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे तो लोकमतशी बोलताना म्हणाला.