शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

भद्रावतीत पाणी पुरवठा योजना होणार कार्यान्वित

By admin | Updated: May 10, 2014 00:07 IST

येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भद्रावतीकरांना शुद्धपाणी मिळणार आहे.

 सचिन सरपटवार - भद्रावती

येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भद्रावतीकरांना शुद्धपाणी मिळणार आहे. वर्धा नदी हेडवर्कस् ते भद्रावती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठा सुरू झाला आहे. याबाबत नुकतीच एक चाचणी घेण्यात आली व ती यशस्वीसुद्धा झाली. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी न.प. पाणी पुरवठा सभापती सुधीर सातपुते तसेच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी फिल्टर मिडियाद्वारे शुद्ध होवून मुख्य साठवण टाकीत भरून तेथून भद्रावती शहराला पाणी पुरवठा करणार्‍या भद्रावती विंजासन, नागमंदीर येथे असलेल्या टाक्यामध्ये पाण्याचा साठा करून नळाद्वारे नागरिकांना शुद्ध पाणी पुरविल्या जाणार आहे. भद्रावती वाढीव पाणी पुरवठा योजना केंद्र शासन पुरस्कृत लहान व मध्यम शहरांच्या विकास योजनेंतर्गत शहराला जलशुद्धीकरण योजना मंजुर झाली. सदर योजनेची मूळ किंमत १७.५२ कोटींची असून ती २००६ मध्ये मंजुर झाली. २००९ मध्ये योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. वाढीव किंमतीच्या सीएसआर दरानुसार सदर योजना २५.२२ कोटी किंमतीची झाली. शहराची लोकसंख्या ७० हजार असून १४ हजार मालमत्ताधारक आहेत. आतापर्यंत चार हजार ५०० नागरिकांना नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. शहरात आवश्यक त्या नवीन वितरण नलिका पसरविण्याचे काम भद्रावती नगरपरिषदेद्वारे हाती घेण्यात आले आहे. ११.५० दशलक्ष क्षमतेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार असून भद्रावती शहराला दररोज साडेअकरा लाख लिटर पाणी पुरवठा होणार आहे. शिल्लक असलेले पाणी महसुल वाढीच्या दृष्टीने रेल्वे, एनटीपीसी, वेकोलि व आयुध निर्माणी यांना दिले जाणार आहे. वेकोलिला दोन लाख लिटर, आयुध निर्माणीला एक लाख लीटर, एनटीपीसीला ५० हजार लीटर, सेंट्रल रेल्वेला एक लाख लिटर पाणी दररोज पुरविण्यात येणार आहे. भद्रावती शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज दोन लक्ष लीटर पाणी अशुद्ध पाणी म्हणून सोडण्यात येणार आहे. सदर पाणी मूळ योजनेनुसार बाजुच्या तलावाला सोडण्याचे प्रस्तावित होते. परंतु सदर पाणी पुनर्वापरासाठी उपयोगात आणण्याबाबत न.प.तर्फे विचारविनिमय करण्यात आला. त्यादृष्टीने संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून पुनर्प्रक्रिया साठवण टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दररोज वाया जाणारे दोन लाख लीटर पाणी वाचून पाणी टंचाईवर निर्बंध येणार आहे.