शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

भद्रावतीत पाणी पुरवठा योजना होणार कार्यान्वित

By admin | Updated: May 10, 2014 00:07 IST

येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भद्रावतीकरांना शुद्धपाणी मिळणार आहे.

 सचिन सरपटवार - भद्रावती

येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भद्रावतीकरांना शुद्धपाणी मिळणार आहे. वर्धा नदी हेडवर्कस् ते भद्रावती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठा सुरू झाला आहे. याबाबत नुकतीच एक चाचणी घेण्यात आली व ती यशस्वीसुद्धा झाली. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी न.प. पाणी पुरवठा सभापती सुधीर सातपुते तसेच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी फिल्टर मिडियाद्वारे शुद्ध होवून मुख्य साठवण टाकीत भरून तेथून भद्रावती शहराला पाणी पुरवठा करणार्‍या भद्रावती विंजासन, नागमंदीर येथे असलेल्या टाक्यामध्ये पाण्याचा साठा करून नळाद्वारे नागरिकांना शुद्ध पाणी पुरविल्या जाणार आहे. भद्रावती वाढीव पाणी पुरवठा योजना केंद्र शासन पुरस्कृत लहान व मध्यम शहरांच्या विकास योजनेंतर्गत शहराला जलशुद्धीकरण योजना मंजुर झाली. सदर योजनेची मूळ किंमत १७.५२ कोटींची असून ती २००६ मध्ये मंजुर झाली. २००९ मध्ये योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. वाढीव किंमतीच्या सीएसआर दरानुसार सदर योजना २५.२२ कोटी किंमतीची झाली. शहराची लोकसंख्या ७० हजार असून १४ हजार मालमत्ताधारक आहेत. आतापर्यंत चार हजार ५०० नागरिकांना नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. शहरात आवश्यक त्या नवीन वितरण नलिका पसरविण्याचे काम भद्रावती नगरपरिषदेद्वारे हाती घेण्यात आले आहे. ११.५० दशलक्ष क्षमतेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार असून भद्रावती शहराला दररोज साडेअकरा लाख लिटर पाणी पुरवठा होणार आहे. शिल्लक असलेले पाणी महसुल वाढीच्या दृष्टीने रेल्वे, एनटीपीसी, वेकोलि व आयुध निर्माणी यांना दिले जाणार आहे. वेकोलिला दोन लाख लिटर, आयुध निर्माणीला एक लाख लीटर, एनटीपीसीला ५० हजार लीटर, सेंट्रल रेल्वेला एक लाख लिटर पाणी दररोज पुरविण्यात येणार आहे. भद्रावती शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज दोन लक्ष लीटर पाणी अशुद्ध पाणी म्हणून सोडण्यात येणार आहे. सदर पाणी मूळ योजनेनुसार बाजुच्या तलावाला सोडण्याचे प्रस्तावित होते. परंतु सदर पाणी पुनर्वापरासाठी उपयोगात आणण्याबाबत न.प.तर्फे विचारविनिमय करण्यात आला. त्यादृष्टीने संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून पुनर्प्रक्रिया साठवण टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दररोज वाया जाणारे दोन लाख लीटर पाणी वाचून पाणी टंचाईवर निर्बंध येणार आहे.