शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत पाणी पुरवठा योजना होणार कार्यान्वित

By admin | Updated: May 10, 2014 00:07 IST

येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भद्रावतीकरांना शुद्धपाणी मिळणार आहे.

 सचिन सरपटवार - भद्रावती

येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भद्रावतीकरांना शुद्धपाणी मिळणार आहे. वर्धा नदी हेडवर्कस् ते भद्रावती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठा सुरू झाला आहे. याबाबत नुकतीच एक चाचणी घेण्यात आली व ती यशस्वीसुद्धा झाली. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी न.प. पाणी पुरवठा सभापती सुधीर सातपुते तसेच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी फिल्टर मिडियाद्वारे शुद्ध होवून मुख्य साठवण टाकीत भरून तेथून भद्रावती शहराला पाणी पुरवठा करणार्‍या भद्रावती विंजासन, नागमंदीर येथे असलेल्या टाक्यामध्ये पाण्याचा साठा करून नळाद्वारे नागरिकांना शुद्ध पाणी पुरविल्या जाणार आहे. भद्रावती वाढीव पाणी पुरवठा योजना केंद्र शासन पुरस्कृत लहान व मध्यम शहरांच्या विकास योजनेंतर्गत शहराला जलशुद्धीकरण योजना मंजुर झाली. सदर योजनेची मूळ किंमत १७.५२ कोटींची असून ती २००६ मध्ये मंजुर झाली. २००९ मध्ये योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. वाढीव किंमतीच्या सीएसआर दरानुसार सदर योजना २५.२२ कोटी किंमतीची झाली. शहराची लोकसंख्या ७० हजार असून १४ हजार मालमत्ताधारक आहेत. आतापर्यंत चार हजार ५०० नागरिकांना नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. शहरात आवश्यक त्या नवीन वितरण नलिका पसरविण्याचे काम भद्रावती नगरपरिषदेद्वारे हाती घेण्यात आले आहे. ११.५० दशलक्ष क्षमतेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार असून भद्रावती शहराला दररोज साडेअकरा लाख लिटर पाणी पुरवठा होणार आहे. शिल्लक असलेले पाणी महसुल वाढीच्या दृष्टीने रेल्वे, एनटीपीसी, वेकोलि व आयुध निर्माणी यांना दिले जाणार आहे. वेकोलिला दोन लाख लिटर, आयुध निर्माणीला एक लाख लीटर, एनटीपीसीला ५० हजार लीटर, सेंट्रल रेल्वेला एक लाख लिटर पाणी दररोज पुरविण्यात येणार आहे. भद्रावती शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज दोन लक्ष लीटर पाणी अशुद्ध पाणी म्हणून सोडण्यात येणार आहे. सदर पाणी मूळ योजनेनुसार बाजुच्या तलावाला सोडण्याचे प्रस्तावित होते. परंतु सदर पाणी पुनर्वापरासाठी उपयोगात आणण्याबाबत न.प.तर्फे विचारविनिमय करण्यात आला. त्यादृष्टीने संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून पुनर्प्रक्रिया साठवण टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दररोज वाया जाणारे दोन लाख लीटर पाणी वाचून पाणी टंचाईवर निर्बंध येणार आहे.