शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

भद्रावती-वरोरा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: February 15, 2016 01:06 IST

भद्रावती व वरोरा हे दोन तालुके मिळून बनलेला वरोरा विधानसभा मतदार संघ राज्याच्या स्थापनेच्या ५५ वर्षानंतरही उपेक्षीत आहे.

नागरिकांना विकासाची प्रतीक्षा : लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेमाजरी : भद्रावती व वरोरा हे दोन तालुके मिळून बनलेला वरोरा विधानसभा मतदार संघ राज्याच्या स्थापनेच्या ५५ वर्षानंतरही उपेक्षीत आहे. बहुतांशवेळा या मतदारसंघातून जे प्रतिनिधी निवडून गेले त्यांच्याच किंवा मित्र पक्षाची राज्यात सत्ता आली. तरीही या मतदार संघाचा अपेक्षीत विकास साधला गेला नाही. मतदार संघातील शेवटच्या टोकापर्यंत नजर टाकली तर हा मतदार संघ समस्यांच्या विळख्यात दिसून येते. आता शासन दरबारी वरोरा विधानसभाक्षेत्र अशी ओळख आहे. यापूर्वी या मतदार संघाचे नाव भद्रावती होते. या मतदार संघाचे केवळ नाव (शहराचे) बदलवून शासनाने काय साध्य केले, हे अद्यापही कळू शकलेले नाही. नाव बदलविण्यापेक्षा विकास गंगा वाहू लागली असती तर जनतेला लाभाचे ठरले असते. या मतदार संघातील कित्येक गावात सरकारी एसटी पोहचली नाही. नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही. शेत सिंचनाची आवश्यकतेप्रमाणे सोय नाही. भद्रावती व वरोरा दोन्ही तालुके प्रदूषणाने ग्रासले आहेत.भद्रावती आणि वरोरा तालुक्यात नदी- नाले असून सुद्धा जनता व शेती मात्र ताहनलेलीच आहे. या विधानसभा क्षेत्रातील प्रदूषण अवाक्याबाहेर गेले आहे. मात्र यावर योजना व उपाय केवळ कागदोपत्रीच दखविले जातात. ग्रामीण क्षेत्रात स्थानिक पातळीवर मुलभूत सुविधा नसल्यने ग्रामीण क्षेत्रात काम करणारे अधिकारी- कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक शासनाकडे आश्वासक विकासाच्या नजरेने पाहत आहे.वरोरा-भद्रावती मतदार संघाअंतर्गत ग्रामीण कित्येक रस्त्यालगत साधे प्रवाशी निवारे नाही. कित्येक ठिकाणची प्रवाशी निवारे जीर्णावस्थेत आहेत. काही निवाऱ्यात किंवा समोरील जागेवर अतिक्रमण झाले आहे. ग्रामीण भागातील विजेच्या खेळ खंडोबाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. अनेक गावात पाण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे. १४ आॅक्टोबर २०१४ ला विधानसभाची सार्वत्रीक निवडणूक झाली. प्रतिनिधी व सरकार बदलले. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. केंद्रात व राज्यात सरकार चालविणारे आमदार- खासदार सत्ताधारीपक्षाचेच आहेत. यामुळे विकास कामासाठी व योजना राबविण्यासाठी निधीची वानवा राहणार नाही, अशी मतदारांची अपेक्षा आहे.सध्या स्थितीचा आढावा घेतला असता विकास कामांअभावी मतदार संघ भकास झाला आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. प्रदूषणाचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसले आहे. यामुळे मानसाला स्वच्छ प्राण वायुचा श्वास घेणेही दुर्लभ झाले आहे. ध्वनी प्रदूषणाने कानठल्या बसत आहे. या दोन्ही तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. (वार्ताहर)