शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

भद्रावतीच्या युवकाचा परभणीत खून

By admin | Updated: April 21, 2017 00:58 IST

मूळचा भद्रावती येथील रहिवासी असलेला पण नोकरीनिमित्त नंदूरबार येथे वास्तव्यंस गेलेल्या विक्की नागेंद्र चटपल्लीवार

आरोपींवर कठोर कारवाई करा: चटपल्लीवार कुटुंबीयांची मागणीभद्रावती : मूळचा भद्रावती येथील रहिवासी असलेला पण नोकरीनिमित्त नंदूरबार येथे वास्तव्यंस गेलेल्या विक्की नागेंद्र चटपल्लीवार या २७ वर्षीय युवकाचा परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका शेतात निर्घृण खून करण्यात आला. यासंदर्भात पिंपळदरी पोलिसाननी चार जणांना अटक केली असली तरी हा खून नेमका कशासाठी झाला, हे गुढ कायम आहे. चटपल्लीवार कुटुंबियांनी यासंदर्भात पत्रपरिषद घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.विक्की चटपल्लीवार हा युवक नंदूरबार येथील महिला बचत वित्तीय महामंडळात नोकरी करीत होता. ७ एप्रिलला आपण आपले मित्र ज्ञानोबा बापूराव मुंडे (३०), त्याची पत्नी, बालाजी उर्फ पिंटू सजीव गुटे (२७), चंद्रकांत पंडीत बारी (४०) व अरुण मधूकर फड (२८) यांच्यासोबत शेगावला एमएच- १९ सीएफ ७११७ या स्वीजर गाडीने जात असल्याचे विक्कीने आपल्या कुटुंबाला रात्री १२ वाजता मोबाईलवरुन कळविले होते. मात्र प्रत्यक्षात ते परभणी जिल्ह्याबाहेर गेलेच नाही. ९ एप्रिलला आपण गंगाखेड तालुक्यातील मित्राच्या शेतातून आल्याचे सांगून आपण दोन दिवसानंतर भद्रावतीला येत असल्याचे विक्कीने कुटुंबीयांना कळविले. त्यानंतर ९ तारखेलाच विक्की हरविला असल्याचा फोन त्याच्या मित्रांनी विक्कीच्या घरी केला.त्यानंतर चटपल्लीवार कुटुंबीय गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तुमचा मुलगा या विहिरीत आहे, असे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शरीरावर गळा आवळल्याच्या खूणा होत्या. त्याचा खून करुन दोराच्या सहाय्याने विहिरीत टाकल्याचे लक्षात आले. पोलिसांनी मदत करण्याऐवजी प्रकरण येथेच संपवा, असा सल्ला दिला. तर आरोपींनी तुम्हाला काय करायचे ते करा, अशी असभ्य भाषा वापरली. यावरुन हे प्रकरण पोलीस दाबण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप चटपल्लीवार कुटुंबियाने पत्रकार परिषदेतून केला आहे. पिंपळदरी पोलिसांनी विक्कीच्या चारही मित्रांना अटक केली. त्यांनी खून केल्याची कबुलीही दिली. मात्र खूनाचे कारण अद्याप कळू शकले नाही. या आरोपींना कठोर शिक्षा देऊन मृत विक्कीला न्याय द्यावा, अशी मागणी वडील नागेंद्र चटपल्लीवार, काका जयप्रकाश चटपल्लीवार, भाऊ विशाल, आई उषा चटपल्लीवार व कल्पेश ठक्कर यांनी पत्रपरिषदेतून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)