शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By admin | Updated: September 10, 2015 00:56 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या ब्रह्मपुरीजवळील जलसेतूमधून तात्पुरत्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर या प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांचे आश्वासन : जलसेतूच्या कामाची पाहणी चंद्रपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या ब्रह्मपुरीजवळील जलसेतूमधून तात्पुरत्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर या प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार आहे. आसोलामेंढा अंतर्गत येणाऱ्या मूल, सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यामुळे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेला, हवालदिल बळीराजा आता सुखावणार, असा विश्वास राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.जलसेतूच्या कामाचा आढावा व पाहणी करण्याकरिता राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांसमोर काम स्थळाला भेट दिली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या जलसेतूच्या अंतिम कामाची पाहणी करून येत्या १० तारखेला पाणी आसोलामेंढा तलावाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही वाढई व रत्नपारखी या विदर्भ सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिली. या दरम्यान ना. मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सदर कामाला गती देऊन कोणत्याही परिस्थितीत येत्या १० तारखेला पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे भ्रमणध्वनीवरून आदेश दिले.शिष्टमंडळात भाजपाचे जिल्हा महामंत्री हरीश शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष चंदू मारगोनवार, मूल भाजपाचे चंद्रकांत आष्टनकर, मूल राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव शेंडे, माजी सरपंच संजय येनूरकर, शाळा समितीचे माजी सभापती प्रवीण येनूरकर, भाजपा सरचिटणीस दिवाकर फाले, युवा नेते नितीन गुरुनुले, युवा मोर्चाचे दिलीप पाल यांचा समावेश होता. पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला असून याचा नक्कीच पिकांना फायदा होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)