शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:06 IST

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि रोजगार हमी योजनेचे दायित्व स्वीकारणाऱ्या शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीने प्रसिध्दी रथाची सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देवैभव नावडकर : रथाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि रोजगार हमी योजनेचे दायित्व स्वीकारणाऱ्या शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीने प्रसिध्दी रथाची सुरूवात करण्यात आली. यातील योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी व्यक्त केले. मंगळवारी माहिती रथाला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) कल्पना निळ आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत येणारे गावातील रस्ते, गाय, म्हैस यांच्याकरिता गोठा, पक्के तळे, अमृत कुंड, शेततळे, अहिल्यादेवी सिंचन विहिर, कल्पवृक्ष फळबाग लागवड, ग्राम सबलीकरणाची समृद्ध ग्राम योजना, स्मशानभूमी बांधकाम, क्रिडागंण, अंगणवाडी, निर्मल शौचालय, समृद्ध गावतलाव, अंकुर रोपवाटिका, भूसंजीवनी कंपोष्ट, भूसंजीवनी गांडूळ खत निर्मिती, आदी विविध योजनांची माहिती या चित्ररथातून देण्यात येत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामान्य जनतेला मिळालेल्या दहा अधिकारांची माहितीदेखील चित्ररथातून दिली जाणार आहे. योजनेची माहिती घेऊन प्रत्यक्षात उपयोगात येणाऱ्या लाभाच्या योजना ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांकडून माहिती घ्यावी. तसेच तहसील कार्यालयातूनही अर्ज भरून लाभ घेता येतो. सरपंचांनी या चित्ररथाचे स्वागत करुन गावकºयांना माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करावी, असे मत उपजिल्हाधिकारी निळ यांनी केले आहे. हा चित्ररथ पुढील पंधरा दिवस जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रचारासाठी जाणार असून नागरिकांनी योजनांची माहिती घेतली पाहिजे. मागील तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध योजना राबविले जात आहेत. या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका व गाव पातळीवर क्लस्टर तयार करण्यात आले. केंद्र व राज्याच्या योजनांचा प्रत्यक्षात पात्र नागरिकांमध्ये पोहोचविण्यासाठी यंत्रणा तयार केली आहे. प्रचार रथाद्वारे नागरिकांच्या विविध शंकांचेही निरसन केले जाणार आहे.उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळे म्हणाले, हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पाठविण्यात येणार आहे. सामूहिक व व्यक्तिगत लाभाच्या योजनांची माहिती देवून कुठे अर्ज भरावा, त्याच्या अटी काय आहेत, यासंदर्भात सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेती, आरोग्य, महिला, बालकल्याण, सिंचन, शेतीपूरक उद्योग, बेरोजगारीवर मात करणाऱ्या विविध योजनांचीही माहिती या चित्ररथाद्वारे दिली जाणार आहे. गावातील सामाजिक संस्था, महिला बचतगट, युवा संघटना आणि शेतकरी गटांसाठीही हा चित्ररथ उपयोगी ठरणार आहे. गावात आल्यानंतर ग्रामपंचायतने सहकार्य करावे, असेही उद्घाटनाप्रसंगी सांगण्यात आले.