शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:54 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत चंद्रपुरातील २१ हजार ५८० नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले होते. मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल देण्याच्या मागणीसाठी शनिवार दि. २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२१ हजार अर्ज : २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवारांच्या नेतृत्वात धडक मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत चंद्रपुरातील २१ हजार ५८० नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले होते. मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल देण्याच्या मागणीसाठी शनिवार दि. २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनतंर्गत शहरातील २१ हजार ५८० जणांंनी घरकुलासाठी शासन दरबारी अर्ज केले. यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. त्यातील दोन हजार २२२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र यात पात्र लाभार्थ्यांनाही अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रशासनाने केवळ गाजर दाखवून त्यांची फसवणूक केली. त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेतंर्गत घरे बांधुन देण्यात यावी, योजनेतील अटी शिथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जदारांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, तसेच या योजनेची पूनर्प्रक्रिया सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा, आदी मागण्यांसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात २० आॅक्टोबरला जैनभवन जवळील कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.चार घटकांमध्ये घरकुल योजनामहाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाच्या वतीने सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व सामन्यांना घर मिळावे, या हेतुने, चार घटाकांमध्ये घरकुल योजना आखण्यात आली आहे. यामध्ये जमिनीची साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्याच ठिकाणी घराचे पुनर्निर्माण करणे, घर बांधकामांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे, भागेदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मीती करणे, आणि आथिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना व्यक्तिगत घरकूल बांधण्यास अनूदान देणे या घटकांचा समावेश आहे. या चारही घटकात मोडणाºया अनेकांनी घरकुलासाठी अर्ज केला मात्र अजूनही त्यांना घरकुलांचा लाभ मिळाला नाही.