शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:54 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत चंद्रपुरातील २१ हजार ५८० नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले होते. मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल देण्याच्या मागणीसाठी शनिवार दि. २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२१ हजार अर्ज : २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवारांच्या नेतृत्वात धडक मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत चंद्रपुरातील २१ हजार ५८० नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले होते. मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल देण्याच्या मागणीसाठी शनिवार दि. २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनतंर्गत शहरातील २१ हजार ५८० जणांंनी घरकुलासाठी शासन दरबारी अर्ज केले. यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. त्यातील दोन हजार २२२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र यात पात्र लाभार्थ्यांनाही अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रशासनाने केवळ गाजर दाखवून त्यांची फसवणूक केली. त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेतंर्गत घरे बांधुन देण्यात यावी, योजनेतील अटी शिथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जदारांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, तसेच या योजनेची पूनर्प्रक्रिया सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा, आदी मागण्यांसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात २० आॅक्टोबरला जैनभवन जवळील कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.चार घटकांमध्ये घरकुल योजनामहाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाच्या वतीने सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व सामन्यांना घर मिळावे, या हेतुने, चार घटाकांमध्ये घरकुल योजना आखण्यात आली आहे. यामध्ये जमिनीची साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्याच ठिकाणी घराचे पुनर्निर्माण करणे, घर बांधकामांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे, भागेदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मीती करणे, आणि आथिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना व्यक्तिगत घरकूल बांधण्यास अनूदान देणे या घटकांचा समावेश आहे. या चारही घटकात मोडणाºया अनेकांनी घरकुलासाठी अर्ज केला मात्र अजूनही त्यांना घरकुलांचा लाभ मिळाला नाही.