शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२९९ शेळ्यांच्या मृत्यूनंतरही लाभार्थी विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:55 IST

मूल, गोंडपिपरी, नागभीड, जिवती व पोंभुर्णा पाच तालुक्यांसाठी शेळीपालन योजना राबविण्यात आली होती. योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडे जबाबदारी होती. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) माध्यमातून पाच तालुक्यातून ४६८ लाभार्थी निवड झाली. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याला २५ टक्के तर अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा स्वत: भरल्यानंतर योजनेचा लाभ देण्यात आला.

ठळक मुद्देशेळीपालन योजनेचे वास्तव : लाभार्थी हिस्सा भरणाऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाच तालुक्यात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत देण्यात आलेल्या शेळ्यांमधून २९९ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. मात्र, शासन व लाभार्थ्यांनी विमा हिस्सा भरूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे.मूल, गोंडपिपरी, नागभीड, जिवती व पोंभुर्णा पाच तालुक्यांसाठी शेळीपालन योजना राबविण्यात आली होती. योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडे जबाबदारी होती. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) माध्यमातून पाच तालुक्यातून ४६८ लाभार्थी निवड झाली. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याला २५ टक्के तर अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा स्वत: भरल्यानंतर योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेत ४६८ प्रस्तावित लाभार्थ्यांपैकी प्रत्यक्षात ४३४ लाभार्थ्यांचीच निवड झाली. त्यापैकी ४३१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी २९ ऑगस्ट २०१९ पूर्वी निधी वितरीत केला. शेळीगट खरेदीसाठी तालुका समिती गठित झाली होती. मात्र, लाभार्थ्यांची पसंती अग्रक्रमावर असताना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी शासकीय प्रक्षेत्रनिहाय पुरवठादारांकडूनच खरेदीचे बंधन घातल्याचा आरोप होत आहे. शेळीगट खरेदी करताना लाभार्थी व खरेदी समितीचे सदस्य उपस्थित नव्हते. एका शेळीगटासाठी ८५ हजार याप्रमाणे रक्कम निश्चित झाली. या रकमेतून शेळीगटांचा विमा काढला होता.

विमा कागदोपत्री रंगविल्याची शंकानागभीड : तालुक्यात शेळ्या व बोकड मृत पावल्याने जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या मासिक सभेत चौकशीचा ठराव झाला होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी व उपचार करून नोंदी ठेवाव्या, लसीकरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विमा केवळ कागदोपत्री रंगविल्याची शंका लाभार्थ्यांनी उपस्थित केली आहे.

आज जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर होणारजिल्हा परिषदेची शुक्रवारी (दि.२६) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेत अर्थसंकल्प सादर होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने नवीन योजना कोणत्या व निधीची तरतूद कशी करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कोरोनामुळे गतवर्षीच्या अर्थसंकल्पाला मोठी कात्री लागली होती.