शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासाला खीळ

By admin | Updated: November 29, 2014 00:57 IST

ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही.

चंद्रपूर : ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही. त्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या ग्रामीण भागाची एलर्जी झाल्यासारखे गावखेड्यापासून दूर राहतात. ज्यांच्या खांद्यावर ग्रामीण विकासाची धुरा आहे. तेच शासनाचे नोकरदार ग्रामीण क्षेत्राकडे पाठ फिरवित असल्याने ग्रामीण विकासात खिळ बसली आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असताना अनेक ग्रामसेवक शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. अनेक जण बाहेरगावाहून कार्यस्थळ असलेल्या गावास अपडाऊन करीत आहे. या अपडाऊनचा बराच वेळ जाण्यायेण्याला जातो. त्यामुळे त्यांच्या वेळेवर अपव्यय होतो. याशिवाय गावातील अनेक विकास कामांना खिळ बसते. गाव खेड्यांचा विकास व्हावा म्हणून शासन ग्रामीण विकासावर करोडो रुपये खर्च करते. त्या नियोजनाकरिता शासनाचे स्वतंत्र मंत्रालयही आहे. परंतु प्रत्यक्ष कामे करताना काही कर्मचारी आपले कर्तव्य इमाने इतबारे निभावत नसल्याच्या चर्चा ग्रामीण भागात ऐकायला मिळतात. अपेक्षेप्रमाणे कामे प्रत्यक्षात न होता बरेचदा ती कागदोपत्रीच होतात. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येते.ग्रामस्थांना विविध कामांक रिता दाखले लागतात. त्याची पूर्तता ग्रामसेवक करतात. शेतकरी व विद्यार्थियांना ग्रामसेवक गावात राहत नसल्यामुळे बाहेरगावी राहत असलेल्या ग्रामसेवकाचे घर शोधत कागदपत्रे मिळवावी लागतात. त्यात अनेकांना आर्थिक झळ व वेळेचा अपव्यय होतो. अनेकदा ग्रामसेवक न भेटल्याुळे हेलपाट्याा बसतात. मोबाई, करावा तर तो अनेकदा नॉट रिचेबल असतो. प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा अनुपस्थितीबाबत विचारणा केल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये बैठकीला होतो असे सांगून ग्रामस्थांची बोळवण केली जाते. ग्रामसेवकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतचा प्रभार असलल्यास तो ग्रामसेवक भेटायला मोठे भाग्यच लागते. ठिकठिकाणी असलेल्या बैठकांचे निमित्य काढून मूळ गावाला दांडी मारणे हे नित्याचेच झाले आहे.(नगर प्रतिनिधी)