शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासाला खीळ

By admin | Updated: November 29, 2014 00:57 IST

ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही.

चंद्रपूर : ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही. त्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या ग्रामीण भागाची एलर्जी झाल्यासारखे गावखेड्यापासून दूर राहतात. ज्यांच्या खांद्यावर ग्रामीण विकासाची धुरा आहे. तेच शासनाचे नोकरदार ग्रामीण क्षेत्राकडे पाठ फिरवित असल्याने ग्रामीण विकासात खिळ बसली आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असताना अनेक ग्रामसेवक शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. अनेक जण बाहेरगावाहून कार्यस्थळ असलेल्या गावास अपडाऊन करीत आहे. या अपडाऊनचा बराच वेळ जाण्यायेण्याला जातो. त्यामुळे त्यांच्या वेळेवर अपव्यय होतो. याशिवाय गावातील अनेक विकास कामांना खिळ बसते. गाव खेड्यांचा विकास व्हावा म्हणून शासन ग्रामीण विकासावर करोडो रुपये खर्च करते. त्या नियोजनाकरिता शासनाचे स्वतंत्र मंत्रालयही आहे. परंतु प्रत्यक्ष कामे करताना काही कर्मचारी आपले कर्तव्य इमाने इतबारे निभावत नसल्याच्या चर्चा ग्रामीण भागात ऐकायला मिळतात. अपेक्षेप्रमाणे कामे प्रत्यक्षात न होता बरेचदा ती कागदोपत्रीच होतात. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येते.ग्रामस्थांना विविध कामांक रिता दाखले लागतात. त्याची पूर्तता ग्रामसेवक करतात. शेतकरी व विद्यार्थियांना ग्रामसेवक गावात राहत नसल्यामुळे बाहेरगावी राहत असलेल्या ग्रामसेवकाचे घर शोधत कागदपत्रे मिळवावी लागतात. त्यात अनेकांना आर्थिक झळ व वेळेचा अपव्यय होतो. अनेकदा ग्रामसेवक न भेटल्याुळे हेलपाट्याा बसतात. मोबाई, करावा तर तो अनेकदा नॉट रिचेबल असतो. प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा अनुपस्थितीबाबत विचारणा केल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये बैठकीला होतो असे सांगून ग्रामस्थांची बोळवण केली जाते. ग्रामसेवकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतचा प्रभार असलल्यास तो ग्रामसेवक भेटायला मोठे भाग्यच लागते. ठिकठिकाणी असलेल्या बैठकांचे निमित्य काढून मूळ गावाला दांडी मारणे हे नित्याचेच झाले आहे.(नगर प्रतिनिधी)