शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासाला खीळ

By admin | Updated: November 29, 2014 00:57 IST

ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही.

चंद्रपूर : ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही. त्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या ग्रामीण भागाची एलर्जी झाल्यासारखे गावखेड्यापासून दूर राहतात. ज्यांच्या खांद्यावर ग्रामीण विकासाची धुरा आहे. तेच शासनाचे नोकरदार ग्रामीण क्षेत्राकडे पाठ फिरवित असल्याने ग्रामीण विकासात खिळ बसली आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असताना अनेक ग्रामसेवक शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. अनेक जण बाहेरगावाहून कार्यस्थळ असलेल्या गावास अपडाऊन करीत आहे. या अपडाऊनचा बराच वेळ जाण्यायेण्याला जातो. त्यामुळे त्यांच्या वेळेवर अपव्यय होतो. याशिवाय गावातील अनेक विकास कामांना खिळ बसते. गाव खेड्यांचा विकास व्हावा म्हणून शासन ग्रामीण विकासावर करोडो रुपये खर्च करते. त्या नियोजनाकरिता शासनाचे स्वतंत्र मंत्रालयही आहे. परंतु प्रत्यक्ष कामे करताना काही कर्मचारी आपले कर्तव्य इमाने इतबारे निभावत नसल्याच्या चर्चा ग्रामीण भागात ऐकायला मिळतात. अपेक्षेप्रमाणे कामे प्रत्यक्षात न होता बरेचदा ती कागदोपत्रीच होतात. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येते.ग्रामस्थांना विविध कामांक रिता दाखले लागतात. त्याची पूर्तता ग्रामसेवक करतात. शेतकरी व विद्यार्थियांना ग्रामसेवक गावात राहत नसल्यामुळे बाहेरगावी राहत असलेल्या ग्रामसेवकाचे घर शोधत कागदपत्रे मिळवावी लागतात. त्यात अनेकांना आर्थिक झळ व वेळेचा अपव्यय होतो. अनेकदा ग्रामसेवक न भेटल्याुळे हेलपाट्याा बसतात. मोबाई, करावा तर तो अनेकदा नॉट रिचेबल असतो. प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा अनुपस्थितीबाबत विचारणा केल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये बैठकीला होतो असे सांगून ग्रामस्थांची बोळवण केली जाते. ग्रामसेवकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतचा प्रभार असलल्यास तो ग्रामसेवक भेटायला मोठे भाग्यच लागते. ठिकठिकाणी असलेल्या बैठकांचे निमित्य काढून मूळ गावाला दांडी मारणे हे नित्याचेच झाले आहे.(नगर प्रतिनिधी)